शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:56 IST

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी विरूद्ध शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांनी सातत्याने मागणी करूनही शिवसेना मविआ सरकारमधून बाहेर पडली नाही. त्यामुळे शिंदे गट मुंबईत परतला नाही. अखेर मंगळवारी विरोधी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी मविआकडे बहुमत नसल्याचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास सांगितलं. याबाबत बोलताना राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, राज्यातील राजकारणाची परिस्थिती 'जैसे थे' (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११ जुलैला पुढील सुनावणीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना राज्यपालांकडून बहुमत चाचणीबाबत पत्र दिलं जाणं याबाबत उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. राज्यपाल पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी मुख्यमत्र्यांच्या सूचनेनुसार वागावे असे सांगितले जाते. त्यामुळे  सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच व्हायला हवे. त्यामुळे उद्या बोलावलेले अधिवेशन घटनाबाह्य आहे. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून ही संपूर्ण परिस्थिती पाहिली की वाईट वाटतं, असे उल्हास बापट म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचं आहे, असेही उल्हास बापट यांनी सांगितले आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे