शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:56 IST

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी विरूद्ध शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांनी सातत्याने मागणी करूनही शिवसेना मविआ सरकारमधून बाहेर पडली नाही. त्यामुळे शिंदे गट मुंबईत परतला नाही. अखेर मंगळवारी विरोधी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी मविआकडे बहुमत नसल्याचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास सांगितलं. याबाबत बोलताना राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, राज्यातील राजकारणाची परिस्थिती 'जैसे थे' (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११ जुलैला पुढील सुनावणीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना राज्यपालांकडून बहुमत चाचणीबाबत पत्र दिलं जाणं याबाबत उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. राज्यपाल पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी मुख्यमत्र्यांच्या सूचनेनुसार वागावे असे सांगितले जाते. त्यामुळे  सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच व्हायला हवे. त्यामुळे उद्या बोलावलेले अधिवेशन घटनाबाह्य आहे. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून ही संपूर्ण परिस्थिती पाहिली की वाईट वाटतं, असे उल्हास बापट म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचं आहे, असेही उल्हास बापट यांनी सांगितले आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे