शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:56 IST

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी विरूद्ध शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांनी सातत्याने मागणी करूनही शिवसेना मविआ सरकारमधून बाहेर पडली नाही. त्यामुळे शिंदे गट मुंबईत परतला नाही. अखेर मंगळवारी विरोधी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी मविआकडे बहुमत नसल्याचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास सांगितलं. याबाबत बोलताना राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, राज्यातील राजकारणाची परिस्थिती 'जैसे थे' (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११ जुलैला पुढील सुनावणीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना राज्यपालांकडून बहुमत चाचणीबाबत पत्र दिलं जाणं याबाबत उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. राज्यपाल पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी मुख्यमत्र्यांच्या सूचनेनुसार वागावे असे सांगितले जाते. त्यामुळे  सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच व्हायला हवे. त्यामुळे उद्या बोलावलेले अधिवेशन घटनाबाह्य आहे. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून ही संपूर्ण परिस्थिती पाहिली की वाईट वाटतं, असे उल्हास बापट म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचं आहे, असेही उल्हास बापट यांनी सांगितले आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे