शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Politics: “सत्यमेव जयतेचा विजय; आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल”: रवी राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:54 IST

Maharashtra News: महाराष्ट्रात जेवढे शाखेचे कार्यालये आहेत, तेही एकनाथ शिंदे यांना मिळतील, असे सांगत रवी राणांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.

Maharashtra Politics: शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगावर टीका होत असताना, अपक्ष आमदार रवी राणा यांनी ठाकरे गट आणि संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. 

संजय राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर गंभीर आरोप केला आहे. यावर बोलताना रवी राणा म्हणाले की, संजय राऊत हे वैतागलेले आहेत. यावर पुढे जास्त काही बोलणार नाही. हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेनेचे आमदार जेव्हा एकनाथ शिंदेंबरोबर गेले, तेव्हा राऊतांनी तुम्ही खोके घेतले, असा आरोप केला. पण आता सत्यमेव जयतेचा विजय झाला. निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंचा विचार असलेल्या एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला आहे, असे रवी राणा यांनी सांगितले. 

आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल

मीडियाशी बोलताना रवी राणा पुढे म्हणाले की, बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निकाल दिला. बहुमतावर आमदार, खासदार बनतात. बहुमतावरच सरकार बनते. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचे ९५ टक्के बहुमत आहे. त्यामुळे त्यांना धनुष्यबाण मिळाला आहे. उद्या त्यांना शिवसेना भवन मिळेल. तसेच महाराष्ट्रात जेवढे शाखेचे कार्यालये आहेत, तेही एकनाथ शिंदे यांना मिळतील, कारण तिथे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत, असे रवी राणा यांनी सांगितले. 

दरम्यान, खोक्यांचा आरोप करणारे आणि नेहमी नामर्द म्हणणाऱ्या संजय राऊतांना माझा प्रश्न आहे, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे आदेश दिले. तेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवाजी महाराजांचे पुतळे काढले. तेव्हा तुमची मर्दानगी कुठे गेली होती? तेव्हा तुम्ही नामर्द झाले होते, या शब्दांत रवी राणा यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत