शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शासन आदेशानुसार राज्यातील सरपंचाचे मानधन वाढवा, आमदार चंद्रदीप नरके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:03 IST

कोपार्डे ( कोल्हापूर ): राज्यातील सरपंच व उप सरपंच वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असून शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांचे मानधन ...

कोपार्डे (कोल्हापूर): राज्यातील सरपंच व उपसरपंच वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असून शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांचे मानधन त्वरित वाढवावे, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनातील गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाने सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे कार्यवाही झालेली नाही. अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणारा सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या २३ सप्टेंबर २०२४ च्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.मात्र, अद्यापपर्यंत सरपंच व उपसरपंचांना वाढीव मानधन प्राप्त झालेले नाही.नवीन वर्षात तरी प्रशासनाकडून सरपंच, उपसरपंच यांना वाढीव मानधन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. शासन दरबारी हा विषय लावून धरल्याने त्यामध्ये शासनाने दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ हजारांपर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ३ वरून ६ हजार तर उपसरपंचाचे मानधन हे १ वरून २ हजार करण्याचा निर्णय झाला आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २ ते ८ हजारांदरम्यान आहे, त्या सरपंचाचे मानधन ४ वरून ८ हजार तर उपसरपंचाचे मानधन १५०० वरून ३ हजार रुपये इतके करण्याचा निर्णय झाला आहे.ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाचे मानधन ५ वरून १० हजार, तर उपसरपंचाचे मानधन २ वरून ४ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.मानधनासाठी ७५ टक्के निधी शासनाकडून आणि २५ टक्के निधी संबंधित ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून दिला जातो. मात्र, वाढीव मानधनाचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याने सरपंच व उपसरपंच वाढीव मानधनापासून वंचित आहेत असे या निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंचChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस