शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

निवडणुकीतील संघर्षमय विजयामुळं भाजपमध्ये जाण्यास गयाराम अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 1:02 PM

सध्याची स्थिती पाहता, भाजपला निवडणुकीपूर्वीची इनकमिंग नडल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहे. अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट निर्माण झाले असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुगलबंदी आणखीच वाढली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र निवडणुकीत झालेल्या संघर्षमय विजयामुळे विरोधी पक्षातील नेते फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.  

विरोधकांना स्पर्धेतच ठेवायच नाही, असा विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी विरोधीपक्ष नेत्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर निवडणुकीत समोर स्पर्धकच नसल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तशी स्थिती राज्यात दिसत होती. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आधाची भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देत निवडूनही आणले. त्यामुळे भाजपच्या विधानसभेच्या अनेक जागा घटल्या. तर राष्ट्रवादीत काठावर असलेले सर्वच नेते सत्ताधारी गटात सामील झाल्याने आता राष्ट्रवादीत काठावर असलेले नेते उरले नाही. 

आधीच अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्याने आता पक्षांतर करण्याच्या विचारात विरोधी पक्षातील आमदार दिसत नाहीत. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी 80 टक्के नेते पराभूत झाले आहे. त्यामुळे पक्षांतर धोक्याचे ठरू शकतं, असा मतप्रवाह नेत्यांमध्ये तयार झाला आहे. यामुळेच आता राज्यात पक्षांतर पाहायला मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.