शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

By यदू जोशी | Updated: May 9, 2024 08:47 IST

Maharashtra Lok sabha Election: निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी मतदारांवर भिस्त, मुंबई आणि परिसर राहणार केंद्रस्थानी

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही सिनेमे असे असतात, की ज्यांची स्टोरी अर्ध्या तासातच समजून जाते. पण काहींमध्ये खूप सस्पेन्स असतो आणि तो हळूहळू उलगडत जातो.  प्रेक्षक म्हणून आपण सुरुवातीला जो अंदाज बांधतो, त्याच्या विपरीत सिनेमात पुढे घडत जाते. महाराष्ट्राच्या राजकीय सिनेमाचा मध्यंतर झाला आहे. लोकसभेच्या ४८ पैकी २४ जागांवर निवडणूक झाली असून, २४ मध्ये व्हायची आहे. आता काय होणार? पिक्चर अभी बाकी है दोस्त... 

 ग्रामीण महाराष्ट्राचे बोट धरून सुरू झालेली लोकसभेची निवडणूक चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी भागात प्रवेश करणार आहे. उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासह काही ग्रामीण आणि काही आदिवासी भागदेखील असेलच; मात्र, मुंबई आणि परिसराभोवती ही निवडणूक आता फिरणार आहे.  उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष तीव्र होईल.

ठाकरे, शिंदे यांची सर्वांत मोठी परीक्षाउद्धव सेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उरलेले दोन टप्पे परीक्षेचे असतील. शिंदे यांच्या वाट्याला  आलेल्या १५ पैकी नऊ जागांची निवडणूक या दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. ­त्यात त्यांचा गड मानला जाणारा ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघदेखील आहेत. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे भारी का एकनाथ शिंदे भारी, याचा फैसलाही यानिमित्ताने होणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले औरंगाबाद उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे, याचा कौल मतदार देणार आहेत.

हे प्रश्न रडारवर....उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका कोणाला बसेल? नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात कांदा कोणाला रडवणार? मुंबईत मराठी, बिगर मराठी मतांचे राजकारण कसे वळण घेईल? 

विदर्भात उरले कवित्वविदर्भातील सर्व दहा जागांची निवडणूक आटोपली आहे. तिथे आता निकालाचे कवित्व तेवढे उरले आहे. उन्हानेकाहिली होत असताना निकालाचे आडाखे-तडाखे बांधले जात आहेत. ज्या विषयाची निवडणुकीत दरवेळी विदर्भात मोठी चर्चा होते, त्या सट्टा बाजाराचा कौल कोणाकडे हादेखील चर्चेचा विषय आहे. सोबत आपापल्या परीने प्रत्येकजण जातीय समीकरणांची फोडणी देत आहे. डीएमके म्हणजे ‘दलित, मुस्लिम, कुणबी’ या फॉर्म्युल्याची चर्चाही जोरात  सुरू असल्याचे दिसते.

शहरी मतदार कोणासोबत? आधीच्या तीन टप्प्यांमधील मतदानाचा आगामी दोन टप्प्यांवर काय परिणाम होतो, हेही महत्त्वाचे असेल. पुणे, मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील मतदारसंघ उर्वरित दोन टप्प्यांमध्ये प्रामुख्याने आहेत. एमएमआर क्षेत्रात राजकीय समीकरणे ही जातीपलीकडची असतात. मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध राहुल गांधी या राजकीय संघर्षात मतदार कोणासोबत ते ठरेल. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका तेवढी महत्त्वाची नव्हती. मात्र, आता ते सभांचा सपाटा लावतील का आणि त्यात कोणावर कशी तोफ डागतील, याविषयी उत्सुकता असेल.

पवार फॅमिली वॉरवर तूर्तास पडदाबारामतीतील लढतीच्या निमित्ताने शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबातील वाद याची प्रचंड चर्चा प्रचार काळात झाली. पवार कुटुंबातील अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुले वगळता, इतर सर्व सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसले.आतापर्यंत अभेद्य राहिलेल्या पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाल्याचे महाराष्ट्राने बघितले. आता बारामतीची निवडणूक आटोपली असल्याने पवार कुटुंबातील  वॉर तूर्तास थांबले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आहेत, असे चित्र असलेल्या शिरूर मतदारसंघात फक्त आता मतदान बाकी आहे.

अजित पवारांची पाव परीक्षा बाकीअजित पवार गटाला मिळालेल्या चार पैकी तीन जागांची म्हणजे बारामती, उस्मानाबाद आणि रायगडची निवडणूक झाली आहे. आता त्यांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूरची निवडणूक तेवढी बाकी आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा प्रभाव असलेल्या पट्ट्यात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सेनेला त्यांची किती मदत होते हे महत्त्वाचे असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहेच.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा