शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजपा लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार; काही खासदारांचा पत्ता कट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:00 IST

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यानंतर जे.पी नड्डा मुंबईत पोहचले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेतला.

मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असून सुमार कामगिरी केलेल्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा मंगळवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी गणेश दर्शनासोबतच पक्षातील नेत्यांसमावेत बैठक घेत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून नड्डांसोबत ही बैठक झाली.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यानंतर जे.पी नड्डा मुंबईत पोहचले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेतला. पुढच्या लोकसभेला भाजपा अनेक धक्कातंत्र वापरणार असल्याचे कळते. त्यात विद्यमान खासदारांच्या काही जागांवर नवीन चेहऱ्यांची चाचपणी केली जात आहे. राज्यातील काही खासदारांच्या कामावर केंद्रीय नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या खासदारांना निरोप देऊन त्यांच्याऐवजी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. सध्या कोणत्या खासदारांचे तिकीट कापणार हे निश्चित सांगितले नसले तरी या बातमीने विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे.

विशेषत: मुंबईत भाजपाच्या काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे. भाजपाने खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. त्या कार्डनुसार कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही हे ठरवण्यात येईल. भाजपाच्या वतीने राज्यात लोकसभा ४५ प्लस जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मिशन ४५ साठी भाजपा अथक प्रयत्न करत आहे. भाजपाने अंतर्गत केलेल्या सर्व्हेत काही खासदारांच्या कामगिरीबद्दल नकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या खासदारांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी नवीन नेते निवडणुकीला उभे करण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोणताही धोका पत्करायचा नाही. ज्या खासदारांची कामगिरी सुमार आहे, त्याचसोबत मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे अशांना तिकीट देऊन नुकसान करण्याची तयारी भाजपाची नाही. त्यामुळे या खासदारांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते यासाठी भाजपाची चाचपणी सुरू आहे.

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस