शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सुधारित सावकारी कायदा मंजूर

By admin | Updated: June 16, 2014 04:08 IST

सावकारांच्या पिळवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक सर्वानुमते मंजूर

मुंबई : सावकारांच्या पिळवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक सर्वानुमते मंजूर झाल्याने सावकारांकडे मागील १५ वर्षे गहाण पडून असलेल्या जमिनी परत त्या मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यामुळे राज्यभरातील सुमारे साडेअकरा हजार शेतकऱ्यांची सावकारी पाशातून सुटका होणार आहे. ही कालमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मांडला आणि तो मंजूर झाला. यामध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या स्थावर मालमत्ता सावकारांकडे गहाण पडल्या आहेत, त्यांनाच अर्ज करता येत होता. परंतु त्यात सुधारणा करून आणखी १० वर्षांचा कालावधी वाढविण्यात आला. परिणामी, १९९९ पासूनच्या गहाण शेतजमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळविता येतील. ज्यांनी आपल्या स्थावर मालमत्ता गहाण टाकल्या असतील, त्यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करावयाचा आहे. या कायद्यामध्ये कलम १९ मध्ये म्हटल्याप्रमाणे उपनिबंधकांनी एक महिन्याच्या आत न्याय द्यायचा आहे. त्यासाठी गृह आणि महसूल विभागाची मदत घेता येणार आहे. तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी दक्ष समिती स्थापन केली जाईल. सावकाराने जमीन विकली असेल तर ती पुन्हा शेतकऱ्याच्या नावावर व्हायला एक महिन्याचा कालावधी असेल. सावकाराने ती जमीन परत केली नाही तर त्याला दंड भरावा लागेल.परंपरागत शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकारे कर्ज वाढवून सावकार जमिनी हडप करीत असत. त्यांना जरब बसविणारे हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी गृह, महसूल आणि सहकार विभागाची मदत घेतली जाणार आहे. या विधेयकाची जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात माहिती पुस्तिकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांमध्ये शेतकरी, शेतकरी मंडळ, विविध संस्था, तलाठ्यांमार्फत प्रबोधन केले जाईल. शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. (विशेष प्रतिनिधी)