शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

सुधारित सावकारी कायदा मंजूर

By admin | Updated: June 16, 2014 04:08 IST

सावकारांच्या पिळवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक सर्वानुमते मंजूर

मुंबई : सावकारांच्या पिळवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक सर्वानुमते मंजूर झाल्याने सावकारांकडे मागील १५ वर्षे गहाण पडून असलेल्या जमिनी परत त्या मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यामुळे राज्यभरातील सुमारे साडेअकरा हजार शेतकऱ्यांची सावकारी पाशातून सुटका होणार आहे. ही कालमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मांडला आणि तो मंजूर झाला. यामध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या स्थावर मालमत्ता सावकारांकडे गहाण पडल्या आहेत, त्यांनाच अर्ज करता येत होता. परंतु त्यात सुधारणा करून आणखी १० वर्षांचा कालावधी वाढविण्यात आला. परिणामी, १९९९ पासूनच्या गहाण शेतजमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळविता येतील. ज्यांनी आपल्या स्थावर मालमत्ता गहाण टाकल्या असतील, त्यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करावयाचा आहे. या कायद्यामध्ये कलम १९ मध्ये म्हटल्याप्रमाणे उपनिबंधकांनी एक महिन्याच्या आत न्याय द्यायचा आहे. त्यासाठी गृह आणि महसूल विभागाची मदत घेता येणार आहे. तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी दक्ष समिती स्थापन केली जाईल. सावकाराने जमीन विकली असेल तर ती पुन्हा शेतकऱ्याच्या नावावर व्हायला एक महिन्याचा कालावधी असेल. सावकाराने ती जमीन परत केली नाही तर त्याला दंड भरावा लागेल.परंपरागत शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकारे कर्ज वाढवून सावकार जमिनी हडप करीत असत. त्यांना जरब बसविणारे हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी गृह, महसूल आणि सहकार विभागाची मदत घेतली जाणार आहे. या विधेयकाची जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात माहिती पुस्तिकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांमध्ये शेतकरी, शेतकरी मंडळ, विविध संस्था, तलाठ्यांमार्फत प्रबोधन केले जाईल. शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. (विशेष प्रतिनिधी)