शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 20:08 IST

भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना  त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली. 

पुणे : भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना  त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली. 

    आषाढी एकादशीनिमित्त सिंग यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मोकळेपणाने आपली मते मांडली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपला चिमटेही काढले. ते म्हणाले की, भाजपमध्ये कोणत्याही मंत्र्याला बोलण्याचा अधिकार नाही. अंतर्गत व्यवस्थेवर मध्यंतरी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना तर वैयक्तिक स्तरावर अधिकाऱ्यांची निवड करण्याचाही अधिकार नसल्याचा उच्चार त्यांनी केला. एवढेच नाही तर मला राजनाथ सिंग यांची दया येते अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

      एमआयएम पक्षाच्या ओवैसी यांनी मध्यंतरी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. ज्याप्रमाणे भाजप धर्मांध हिंदुत्वाचा अजेंडा पुढे आणत आहे त्याप्रमाणे एमआयएम धर्मांध मुस्लिम जातीयत्वाचा मुद्दा वापरत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसRajnath Singhराजनाथ सिंह