शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

इगतपुरीकडून ‘लॉँग मार्च’ची मंत्रालयाकडे कूच, किसान सभा; विधिमंडळाला घालणार घेराव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:20 AM

‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण हे चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. १२ मार्चला मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.

इगतपुरी (जि. नाशिक) - ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण हे चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. १२ मार्चला मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.राज्य किसान सभेच्यावतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतक-यांच्या लॉँग मार्चला प्रारंभ झाला. वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विनाअट सर्व शेतकºयांना कर्ज मुक्ती द्यावी, वीज बिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार- पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे.या मोर्चात महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा, येथील शेतकरी सहभागी झाले असून प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत.फडणवीस सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकºयांचे बळी जात आहेत. त्या निषेधार्थ व शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यत मुंबई सोडणार नाही.- कॉ. विलास बाबरपालघर जिल्ह्यातील डहाणू येथील शेतकरी बांधवांची अवस्था दयनीय झाली आहे. कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज महिला दिनी गरीब शेतकºयांना न्यायाकरिता रस्त्यावर उतरावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे.- रु पाली राठोड,जनवादी महिला संघटक, डहाणू 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र