शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एवढे बोलता मग घाबरता कशाला?; श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 20:14 IST

कल्याणमध्ये घेतलेल्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला

कल्याण - काहींनी सुरक्षा हवी यासाठी खोटा बनाव रचला. काळू-बाळूची जोडी तसे हे आहेत. सुरक्षा पाहिजे होती तर मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगायचे. एक पुढे आणि एक मागे पोलिसांची गाडी दिली असती. पण या गोष्टी करायची गरजच काय? एवढे तुम्ही बोलता मग घाबरता कशाला? माझ्यावर आरोप लावले मी सुपारी दिलाय. त्यावेळीही तोंडावर आपटले आणि आताही आपटले अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. 

कल्याणमध्ये घेतलेल्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. श्रीकांत शिंदे म्हणाले की, राम मंदिर बांधणे, कलम ३७० हटवणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले त्यांच्यासोबत आपण गेलो तर चूक काय? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सरकारला शिव्या देण्याचे काम करतायेत. झोपेतही हे गद्दार गद्दार बोलत असतील. एकाने थुंकण्यापर्यंत मजल गेली. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. राज्याची संस्कृती खराब करण्याचं काम या लोकांनी केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच एकनाथ शिंदे यांनी सगळं पणाला लावलेले होते. हे सरकार बनेल त्यांना माहिती नव्हते. जिथे सरकार असते तिथे लोक जातात पण इथं सरकार असून मंत्री, आमदार, खासदार बाहेर जातायेत हे पहिल्यांदा घडलंय. एकनाथ शिंदे यांना अनेक गोष्टी पटल्या नाहीत. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण केले आधाच्या सरकारने केले. परंतु आपले सरकार येताच अफझलखानच्या कबरीवरील अनाधिकृत बांधकाम पाडले. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणू शकत नव्हते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, आनंद दिघेंसोबत काम करणारे लोक आहेत. एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आमच्यासोबत आले. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पीपीई किट घालून कोरोना काळात बाहेर पडले. युतीत आपण काही बोलल्याने वितुष्ट येईल असं करू नका. संयम बाळगावा. आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा युती म्हणून लढणार आहोत. लोकांपर्यंत आपल्याला पोहचायचे आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवावा. १९ जून रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने हजर राहा असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेSanjay Rautसंजय राऊत