शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 11:36 AM

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली.

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी जो काही मराठी अस्मिता जपणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नाने आयोजित केला होता तिथे आले होते. यावेळी विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मराठीसम्राट मा. राज ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून फालतू टीका केली.राज ठाकरे व एक यूपीचा रिक्षावाला यांचा डीएनए तपासला तर दोघांचा डीएनए नक्कीच एक निघेल, असे वक्तव्य त्यांनी या जाहीर कार्यक्रमात केले. याशिवाय यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज यांनी आपल्याला डीएनएबाबत आव्हान केल्यास राज यांचा डीएनए यूपीचाच असल्याचे सिद्ध करून दाखवू, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच राज यांना हे माहीत असल्यानेच ते सध्या यूपीवाल्यांच्या विरोधात बोलत नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.दरम्यान स्वामी यांच्या वक्तव्यामुळे संतापलेले मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम ह्यांच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते एकटे कार्यक्रम ठिकाणी पोहोचले व थेट स्वामींना राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. त्यावेळी कदम यांनी स्वामीना उद्देशून तुम्ही मराठी माणसासाठी काय केले आहे .राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जे काम केले आहे. ते तुम्ही केले आहे का. तुम्हाला त्यांचा डीएनए काढण्याचा अधिकार काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच सत्ताधारी तुम्ही, एकहाती सत्ता आहे. मग शहर सुंदर करा फेरीवालामुक्त करा, असली स्टेटमेंट करून आपापसात भांडण का लावता, असा जाब विचारला. त्यावेळेस स्वामी बोलले तुम लोग युपीके टॅक्सीवालेको मारते हो, तेव्हा राजेश कदम ह्यांनी मुंबई व परिसराची कॅप्यासिटी संपली आहे, लोंढे थांबवा ह्या मा. राजसाहेबांच्या इशाऱ्याला आता एका अहवालाने सुद्धा पुष्टी दिली त्यावर अभ्यास करा, तसेच त्यांना तुमच्या प्रांतात येऊन मराठी माणसाने कायदे कानून तोडले तर तुम्ही सहन कराल का..? मराठी माणूस म्हणजे मराठी भाषा, मराठी अस्मिता व मराठी भूमीवर जो प्रेम करतो तो मराठी मग तो यूपीवाला असो की बिहारवाला ही व्याख्या समजावून सांगितली. जवळपास तीन ते चार मिनिटे राजेश कदम स्वामींना त्यांच्याच बॉडीगार्डच्या घोळक्यात घुसून समजावत होते. मनसे देशाला मानतो पण महाराष्ट्राची वेळ येईल तिथे प्राधान्य आमच्या महाराष्ट्राला, काश्मीरमध्ये पण आम्ही घुसायला तयार आहोत. पण उगीच तुम्ही अश्या फालतू स्टेटमेंट करून राज्याराज्यात भांडणे लावू नका, असे सुनावल्यावर स्वामींची बोलतीच ह्यावेळी बंद झाली होती. ह्यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे देखील तेथे स्वामींसोबत चहापाणी करत होते, मात्र राजेश कदम यांच रौद्ररूप पाहून व कदाचित मराठी माणूस म्हणून व राजसाहेबांबाबतचे जे खडे बोल स्वामींना एेकवले ते त्यांना पटत असल्यामुळे राज्यमंत्र्यांनी देखील राजेश कदम यांची समजूत काढून संयमाने विषय हाताळला..मराठी डोंबिवलीत येऊन मराठी हृदयसम्राटांविषयीचे वेडेवाकडे बोल सहन केले जाणारच नाही, मागे देखील रोटरीच्या अश्याच कार्यक्रमाला डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात लालूप्रसाद यादवला आमंत्रित केले होते, मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते, लालूला मनसे कार्यकर्त्यांपासून तोंड लपवत छपवत डोंबिवलीच्या बाहेर घेऊन जाण्याची वेळ आली होती.डोंबिवलीतल्या सामाजिक संस्थांना विनंती, महाराष्ट्रात व मराठी असलेले व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रमुख वक्त्यांची येथे कमी नाही, स्वामी, लालू सारख्या बेडगी व मराठी माणसांचा द्वेष करणारे, अपमान करणारे पाहुणे हवेतच कश्याला..? येवढा तरी मराठीचा अभिमान बाळगा ही विनंती. मा.राज ठाकरे जे करतात ते मराठी अस्मितेसाठीच करत आहेत भले आम्हाला तुमचे मतदान नका करू पण मराठी माणसाचा अपमान सुध्दा सहन नका करू ही विनंती.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसेMNSमनसेSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी