शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 13:14 IST

Devendra Fadnavis News: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर  घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही भाजपा सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. मात्र या घटनेनंतर अडीच वर्षांनी या सर्वांचा वचपा काढताना भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूंग लावत अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपल्यासोबत युतीमध्ये आणले होते. या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जर २०१९ मध्ये जनतेनं दिलेला निकाल धुडकावून जनादेश नाकारून आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मी एवढंच सांगेन की, जनतेने बहुमत दिलेल्या सरकारला जेव्हा लोकशाही विरोधी पद्धतीने बाहेर केलं जातं तेव्हा महाराष्ट्रात घडल्या तशा घटना घडतात. मला वाटतं की, जर २०१९ मध्ये जनतेनं दिलेला निकाल धुडकावून जनादेश नाकारून आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर ही परिस्थिती ओढवली नसती. महाराष्ट्राला एक चांगलं स्थिर सरकार मिळालं असतं. मात्र आता आम्ही परत आलो आहोत. तसेच राज्याला स्थिर सरकार देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ‘आगे आगे देखीए होता है क्या’, असं राज्यातील पुढील घडामोडींबाबत सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे. 

त्यांनी पुढे सांगितले की, आमच्यासोबत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. एकप्रकारे बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत आहे. तसेच शिवसेनेसोबतची आमची युती ही भावनिक आहे. तर अजित पवार यांच्यासोबत तयार केलेली आघाडी ही राजकीय आहे. कदाचित ५-१० वर्षांनंतर ही आघाडीसुद्धा भावनिक होईल, अशी अपेक्षा आहे, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा फोन करायचे तेव्हा मी यायचो, भेटायचो बोलायचो. मात्र २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझे फोन उचलणे बंद केले होते. आता उद्धव ठाकरे हे आमच्यापासून मनाने दूर झाले आहेत. ते आता माझे मित्र आहेत का हे त्यांनाच विचारा. आता उद्धव ठाकरेंसोबत जाणं अशक्य आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या महायुतीत येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा