शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 13:14 IST

Devendra Fadnavis News: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर  घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही भाजपा सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. मात्र या घटनेनंतर अडीच वर्षांनी या सर्वांचा वचपा काढताना भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूंग लावत अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपल्यासोबत युतीमध्ये आणले होते. या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जर २०१९ मध्ये जनतेनं दिलेला निकाल धुडकावून जनादेश नाकारून आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मी एवढंच सांगेन की, जनतेने बहुमत दिलेल्या सरकारला जेव्हा लोकशाही विरोधी पद्धतीने बाहेर केलं जातं तेव्हा महाराष्ट्रात घडल्या तशा घटना घडतात. मला वाटतं की, जर २०१९ मध्ये जनतेनं दिलेला निकाल धुडकावून जनादेश नाकारून आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर ही परिस्थिती ओढवली नसती. महाराष्ट्राला एक चांगलं स्थिर सरकार मिळालं असतं. मात्र आता आम्ही परत आलो आहोत. तसेच राज्याला स्थिर सरकार देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ‘आगे आगे देखीए होता है क्या’, असं राज्यातील पुढील घडामोडींबाबत सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे. 

त्यांनी पुढे सांगितले की, आमच्यासोबत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. एकप्रकारे बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत आहे. तसेच शिवसेनेसोबतची आमची युती ही भावनिक आहे. तर अजित पवार यांच्यासोबत तयार केलेली आघाडी ही राजकीय आहे. कदाचित ५-१० वर्षांनंतर ही आघाडीसुद्धा भावनिक होईल, अशी अपेक्षा आहे, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा फोन करायचे तेव्हा मी यायचो, भेटायचो बोलायचो. मात्र २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझे फोन उचलणे बंद केले होते. आता उद्धव ठाकरे हे आमच्यापासून मनाने दूर झाले आहेत. ते आता माझे मित्र आहेत का हे त्यांनाच विचारा. आता उद्धव ठाकरेंसोबत जाणं अशक्य आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या महायुतीत येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा