शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जर काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 11:28 IST

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - जर या देशात काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील हे सगळे काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. काही मतभेद असतील परंतु जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसते. हा देश बुवा, महाराज, जादूटोणा, तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असता जो आज गेलेला आहे. लाल बहादूर शास्त्री मिळाले, राजीव गांधी, इंदिरा गांधी मिळाल्या. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. काँग्रेस नसती तर हे झाले नसते. त्यामुळे भाजपाने काँग्रेसचे ऋण व्यक्त केले पाहिजे. काँग्रेसमुळे आज तुम्ही स्वातंत्र्याची सूर्यकिरणे पाहताय असं त्यांनी सांगितले. 

जागावाटपात कुणाचीही नाराजी नाही

मी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत हजर होतो. मी स्वत: होतो, शरद पवार, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अशोक गहलोत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळे होते. जागावाटपावर ज्या थोड्या फार अडचणी होत्या त्या मिटवण्यात आल्या असून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू असं सांगत संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या नाराजीवर भाष्य केले. 

प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने विचार करावा

महाविकास आघाडीत ४८ जागांवर फॉर्म्युला निश्चित केला आहे. आमचा प्रकाश आंबेडकरांशी संवाद सुरू आहे. आंबेडकरांची जी भूमिका आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे हे आम्हालाही मान्य आहे. त्याविरोधात प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा सहभाग झाला. आम्ही त्यांना ४ जागांची ऑफर दिली आहे. त्याबाबत त्यांच्या पक्षात विचार सुरू आहे. आंबेडकरी जनता आणि वंचित जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. जे संविधान बदलू इच्छितात अशा कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात थारा मिळू नये. या लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत मिळू नये असं जनतेला वाटते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल असं संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस