शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जर काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 11:28 IST

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - जर या देशात काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील हे सगळे काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. काही मतभेद असतील परंतु जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसते. हा देश बुवा, महाराज, जादूटोणा, तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असता जो आज गेलेला आहे. लाल बहादूर शास्त्री मिळाले, राजीव गांधी, इंदिरा गांधी मिळाल्या. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. काँग्रेस नसती तर हे झाले नसते. त्यामुळे भाजपाने काँग्रेसचे ऋण व्यक्त केले पाहिजे. काँग्रेसमुळे आज तुम्ही स्वातंत्र्याची सूर्यकिरणे पाहताय असं त्यांनी सांगितले. 

जागावाटपात कुणाचीही नाराजी नाही

मी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत हजर होतो. मी स्वत: होतो, शरद पवार, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अशोक गहलोत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळे होते. जागावाटपावर ज्या थोड्या फार अडचणी होत्या त्या मिटवण्यात आल्या असून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू असं सांगत संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या नाराजीवर भाष्य केले. 

प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने विचार करावा

महाविकास आघाडीत ४८ जागांवर फॉर्म्युला निश्चित केला आहे. आमचा प्रकाश आंबेडकरांशी संवाद सुरू आहे. आंबेडकरांची जी भूमिका आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे हे आम्हालाही मान्य आहे. त्याविरोधात प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा सहभाग झाला. आम्ही त्यांना ४ जागांची ऑफर दिली आहे. त्याबाबत त्यांच्या पक्षात विचार सुरू आहे. आंबेडकरी जनता आणि वंचित जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. जे संविधान बदलू इच्छितात अशा कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात थारा मिळू नये. या लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत मिळू नये असं जनतेला वाटते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल असं संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस