शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:10 IST

Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा ठाकरे सेनेच्या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतू, दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, यानंतर एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी राज यांची भेट घेतली यामुळे नेमके वरच्या पातळीवर काय राजकारण सुरु आहे, याचा अंदाज येत नाहीय. परंतू, एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्यासोबत नेल्याने राज ठाकरे सोबत आले तर उरलेल्या ठाकरे शिवसेनेला फायदा होईल या आशेवर उबाठा शिवसेनेचे नेते बसले आहेत. राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे वक्तव्य आले आहे. आम्ही आशावादी आहोत, भाजपा दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल का, याचा विचार भाजप करत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54 टक्के मते या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे आला आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे, असा दावा जाधव यांनी केला आहे. 

शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या वृत्तावरून देखील जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे. विरोधी पक्षाचे आमदार, खासदारांबद्दल अफवा पसरवणे आणि भाजप बद्दल लोकांचे प्रेम किती वाढले आहे, असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होऊन, त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाही, हा त्यांचा पराभव आहे याचाच विसर या लोकांना पडला आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत सुटले आहेत. सत्तेची आलेली ही सूज आहे. सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल, अशी टीका जाधव यांनी केली. 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळाले, तरी ते एकत्र लढणार आहेत. त्यामुळे आम्ही आघाडी करून एकत्र लढलो, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असेही जाधव यांनी सांगितले. संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो. सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचे राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे, असाही आरोप जाधव यांनी केला आहे. जाधव हे नागपूरला आले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव