शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:10 IST

Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा ठाकरे सेनेच्या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतू, दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, यानंतर एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी राज यांची भेट घेतली यामुळे नेमके वरच्या पातळीवर काय राजकारण सुरु आहे, याचा अंदाज येत नाहीय. परंतू, एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्यासोबत नेल्याने राज ठाकरे सोबत आले तर उरलेल्या ठाकरे शिवसेनेला फायदा होईल या आशेवर उबाठा शिवसेनेचे नेते बसले आहेत. राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे वक्तव्य आले आहे. आम्ही आशावादी आहोत, भाजपा दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल का, याचा विचार भाजप करत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54 टक्के मते या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे आला आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे, असा दावा जाधव यांनी केला आहे. 

शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या वृत्तावरून देखील जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे. विरोधी पक्षाचे आमदार, खासदारांबद्दल अफवा पसरवणे आणि भाजप बद्दल लोकांचे प्रेम किती वाढले आहे, असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होऊन, त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाही, हा त्यांचा पराभव आहे याचाच विसर या लोकांना पडला आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत सुटले आहेत. सत्तेची आलेली ही सूज आहे. सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल, अशी टीका जाधव यांनी केली. 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळाले, तरी ते एकत्र लढणार आहेत. त्यामुळे आम्ही आघाडी करून एकत्र लढलो, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असेही जाधव यांनी सांगितले. संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो. सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचे राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे, असाही आरोप जाधव यांनी केला आहे. जाधव हे नागपूरला आले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव