शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:10 IST

Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा ठाकरे सेनेच्या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतू, दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, यानंतर एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी राज यांची भेट घेतली यामुळे नेमके वरच्या पातळीवर काय राजकारण सुरु आहे, याचा अंदाज येत नाहीय. परंतू, एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्यासोबत नेल्याने राज ठाकरे सोबत आले तर उरलेल्या ठाकरे शिवसेनेला फायदा होईल या आशेवर उबाठा शिवसेनेचे नेते बसले आहेत. राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे वक्तव्य आले आहे. आम्ही आशावादी आहोत, भाजपा दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल का, याचा विचार भाजप करत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54 टक्के मते या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे आला आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे, असा दावा जाधव यांनी केला आहे. 

शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या वृत्तावरून देखील जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे. विरोधी पक्षाचे आमदार, खासदारांबद्दल अफवा पसरवणे आणि भाजप बद्दल लोकांचे प्रेम किती वाढले आहे, असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होऊन, त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाही, हा त्यांचा पराभव आहे याचाच विसर या लोकांना पडला आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत सुटले आहेत. सत्तेची आलेली ही सूज आहे. सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल, अशी टीका जाधव यांनी केली. 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळाले, तरी ते एकत्र लढणार आहेत. त्यामुळे आम्ही आघाडी करून एकत्र लढलो, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असेही जाधव यांनी सांगितले. संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो. सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचे राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे, असाही आरोप जाधव यांनी केला आहे. जाधव हे नागपूरला आले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव