शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:40 IST

Marathwada Flood Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

नागपूर - मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,  अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहेत. पण हा केवळ देखावा आहे. किती मदत देणार सांगावे असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेलं आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवाबनवी सरकार करत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केल्यावर वित्तमंत्री अजित पवार का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू, ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही, ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे. मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर कीड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्यांचं आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे. असं वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपले वेतन द्यावे, असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Government neglecting farmers, pushing them to suicide: Vijay Wadettiwar slams government.

Web Summary : Vijay Wadettiwar criticizes the government for its inaction on farmer loan waivers after heavy losses in Marathwada. He questions the government's priorities, urging immediate aid and demanding increased compensation for crop and land damage. Wadettiwar pledged six months of his salary to the CM relief fund.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfloodपूरMarathwadaमराठवाडाcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार