शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:26 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणारा जो कायदा आधीच्या सरकारने केला होता तो ‘फूलप्रुफ’ (परिपूर्ण / बिनचूक) असता तर आज इथे येण्याची वेळ कशाला आली असती, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तरे दिली. हा कायदा फूलप्रुफ होता. पण, सध्याच्या सरकारला तो टिकवता आला नाही, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की, त्या फुलप्रुफ कायद्याचे काय झाले ते आज सगळ्यांसमोर आहेच. तसे असते तर आज या ठिकाणी यायची वेळ आमच्यावर आलीच नसती.

मराठा समाज संयम राखेलमराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने आजवर संयमच दाखविला आहे. आपली लढाई राज्य सरकारविरुद्ध नाही, हे त्यांना पटलेले आहे. सरकार आणि सगळेच राजकीय पक्ष त्यांच्यासोबत आहेत तसेच मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत.

राज्यपालांबद्दल आदरचराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी आलेली कटुता आता संपली आहे का, या प्रश्नात ठाकरे म्हणाले की, कटुता, गोडवा असे काही नसते. समोरून जसे बोलले जाते तसे उत्तर आम्ही देतो. राज्यपालांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पुढेही राहील.

...हा दुटप्पीपणा; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा फुलप्रुफ नव्हता! किती हा दुटप्पीपणा’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते व कायदाही अवैध ठरतो. मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस