शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:26 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणारा जो कायदा आधीच्या सरकारने केला होता तो ‘फूलप्रुफ’ (परिपूर्ण / बिनचूक) असता तर आज इथे येण्याची वेळ कशाला आली असती, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तरे दिली. हा कायदा फूलप्रुफ होता. पण, सध्याच्या सरकारला तो टिकवता आला नाही, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की, त्या फुलप्रुफ कायद्याचे काय झाले ते आज सगळ्यांसमोर आहेच. तसे असते तर आज या ठिकाणी यायची वेळ आमच्यावर आलीच नसती.

मराठा समाज संयम राखेलमराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने आजवर संयमच दाखविला आहे. आपली लढाई राज्य सरकारविरुद्ध नाही, हे त्यांना पटलेले आहे. सरकार आणि सगळेच राजकीय पक्ष त्यांच्यासोबत आहेत तसेच मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत.

राज्यपालांबद्दल आदरचराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी आलेली कटुता आता संपली आहे का, या प्रश्नात ठाकरे म्हणाले की, कटुता, गोडवा असे काही नसते. समोरून जसे बोलले जाते तसे उत्तर आम्ही देतो. राज्यपालांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पुढेही राहील.

...हा दुटप्पीपणा; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा फुलप्रुफ नव्हता! किती हा दुटप्पीपणा’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते व कायदाही अवैध ठरतो. मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस