शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:26 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणारा जो कायदा आधीच्या सरकारने केला होता तो ‘फूलप्रुफ’ (परिपूर्ण / बिनचूक) असता तर आज इथे येण्याची वेळ कशाला आली असती, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तरे दिली. हा कायदा फूलप्रुफ होता. पण, सध्याच्या सरकारला तो टिकवता आला नाही, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की, त्या फुलप्रुफ कायद्याचे काय झाले ते आज सगळ्यांसमोर आहेच. तसे असते तर आज या ठिकाणी यायची वेळ आमच्यावर आलीच नसती.

मराठा समाज संयम राखेलमराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने आजवर संयमच दाखविला आहे. आपली लढाई राज्य सरकारविरुद्ध नाही, हे त्यांना पटलेले आहे. सरकार आणि सगळेच राजकीय पक्ष त्यांच्यासोबत आहेत तसेच मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत.

राज्यपालांबद्दल आदरचराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी आलेली कटुता आता संपली आहे का, या प्रश्नात ठाकरे म्हणाले की, कटुता, गोडवा असे काही नसते. समोरून जसे बोलले जाते तसे उत्तर आम्ही देतो. राज्यपालांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पुढेही राहील.

...हा दुटप्पीपणा; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा फुलप्रुफ नव्हता! किती हा दुटप्पीपणा’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते व कायदाही अवैध ठरतो. मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस