शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला वेग, मग डॉ दाभोलकरांच्या का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 18:54 IST

तपासप्रकरणी दिरंगाई होत असून याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (20) जवाब दो आंदोलन छेडणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत देखील हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देपुण्यात पाचव्या स्मृतीदिनानिमित्त जवाब दो आंदोलन

पुणे :  डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. अद्यापही पोलीस प्रशासनाला त्यांच्या मारेक-यांच्या तपासाची दिशा सापडलेली नाही. दुसरीकडे कर्नाटक सरकारने गौरी लंकेश खून तपासात मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून महाराष्ट्र शासन व सीबीआयला अपयशाला सामोरे का जावे लागत आहे. असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. तपासप्रकरणी दिरंगाई होत असून याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (20) जवाब दो आंदोलन छेडणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत देखील हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

        पुणे, नागपूर, औरंगाबाद सह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात अभिनेते प्रकाश राज, ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर, महात्मा गांधीचे पणतु तुषार गांधी आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे सहभागी होणार आहेत. साने गुरुजी स्मारक येथे विविध मान्यवर मनोगत व्यक्त करणार असून यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय क लबुर्गी, मुक्ता दाभोलकर यांहा समावेश आहे. अभिव्यक्ती के खतरे यावर प्रकाश राज व पालेकर विचार व्यक्त करणार असून याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच इचलकरंजी येथील स्मिता पाटील कलापथक - राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने  ‘‘गांधींचं करायचं काय?’’ हे एक अंकी नाटक सादर होणार आहे.

       महाराष्ट्राबरोबरच केरळ, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच आॅल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या एकत्रित प्रयत्नांतून 20 आॅगस्ट रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाभोलकरांचे वैज्ञानिक विचार समाजापर्यंत पोहचविले जाणार आहे. 

      उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासन व सरकारला अनेकदा फटकारुन देखील तपासात प्रगती होत नाही. हे खेदजनक असल्याचे नमूद केले आहे. यावेळी अंनिसने लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली.  मागील ५९ महिने झाले आम्ही डॉ दाभोलकरांचा खून झाला त्या पुलावर जमतो.मात्र एकदाही पुणे जिल्ह्यातील आमदार किंवा खासदार इथे आलेले नाहीत. पालकमंत्री गिरीश बापट इतक्या जवळ राहतात मात्र त्यांनीही याकडे अद्याप लक्ष दिले नाही, ते पालकमंत्री असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे असेही मत मांडण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMurderखूनCrimeगुन्हा