शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:49 IST

ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

मुंबई - भाजपासोबतची चर्चा पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच झाली. १५-२० दिवसांत घडामोडी घडल्या. दिल्ली आणि मुंबईतल्या बैठकीत मी सहभागी होतो. सकाळच्या शपथविधीबाबत काळाच्या ओघात उत्तरे मिळतील. हल्ली अनेकजण स्वत:ला फार काही समजण्याच्या नावाखाली अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले चूक झाली असं विधाने करतात. पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले ही मेहरबानी नव्हती. अजितदादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडीचे सरकार ८ दिवसही टिकले नसते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे. सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय आत्ताच घेतला नाही. तर २०१४ पासून पक्ष नेतृत्वाने याची सुरुवात केली होती. २०१४ ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षात संघर्ष नव्हता. भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. २०१६-१७ मध्येही मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला. जवळपास मंत्रिमंडळातील खाती ठरली होती, पालकमंत्रिपदे ठरली. लोकसभेच्या जागांचे वाटपही झाले होते असं तटकरेंनी सांगितले.  

तसेच काही कारणास्तव ती चर्चा पुढे गेली नाही. २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट कौल भाजपा-शिवसेना युतीला मिळाला. १७६ जागांवर युती निवडून आली होती. आघाडीला १०० जागा मिळाल्या होत्या. जनतेचा कौल कुणी, कशाला आणि का नाकारला हे पाहा. त्यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यात देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे काही तासांचे सरकार आले. ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले. त्यात २ पर्यात भाजपा-राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं होतं. एकाचवेळी आमची दोन्हीकडे चर्चा सुरू होती अशी माहिती तटकरेंनी दिली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आमदारांच्या मनात खदखद होती. अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्यच होता असं वाटत होते. तीन पक्षांच्या सरकारऐवजी दोन पक्षाचे सरकार चांगले ठरले असते असं आमदारांच्या मनात होते. ज्यादिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला हेड काऊंटने बहुमत चाचणी घ्या. हा निर्णय आला नसता तर कदाचित वेगळं काही घडले असते. जे घडू शकते याचा विचार करत पक्षनेतृत्वाने अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ती मेहरबानी नव्हती तर पक्षाच्या अस्तित्वासाठी घेतलेली भूमिका होती असं सुनील तटकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवार