शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:49 IST

ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

मुंबई - भाजपासोबतची चर्चा पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच झाली. १५-२० दिवसांत घडामोडी घडल्या. दिल्ली आणि मुंबईतल्या बैठकीत मी सहभागी होतो. सकाळच्या शपथविधीबाबत काळाच्या ओघात उत्तरे मिळतील. हल्ली अनेकजण स्वत:ला फार काही समजण्याच्या नावाखाली अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले चूक झाली असं विधाने करतात. पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले ही मेहरबानी नव्हती. अजितदादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडीचे सरकार ८ दिवसही टिकले नसते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे. सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय आत्ताच घेतला नाही. तर २०१४ पासून पक्ष नेतृत्वाने याची सुरुवात केली होती. २०१४ ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षात संघर्ष नव्हता. भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. २०१६-१७ मध्येही मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला. जवळपास मंत्रिमंडळातील खाती ठरली होती, पालकमंत्रिपदे ठरली. लोकसभेच्या जागांचे वाटपही झाले होते असं तटकरेंनी सांगितले.  

तसेच काही कारणास्तव ती चर्चा पुढे गेली नाही. २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट कौल भाजपा-शिवसेना युतीला मिळाला. १७६ जागांवर युती निवडून आली होती. आघाडीला १०० जागा मिळाल्या होत्या. जनतेचा कौल कुणी, कशाला आणि का नाकारला हे पाहा. त्यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यात देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे काही तासांचे सरकार आले. ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले. त्यात २ पर्यात भाजपा-राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं होतं. एकाचवेळी आमची दोन्हीकडे चर्चा सुरू होती अशी माहिती तटकरेंनी दिली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आमदारांच्या मनात खदखद होती. अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्यच होता असं वाटत होते. तीन पक्षांच्या सरकारऐवजी दोन पक्षाचे सरकार चांगले ठरले असते असं आमदारांच्या मनात होते. ज्यादिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला हेड काऊंटने बहुमत चाचणी घ्या. हा निर्णय आला नसता तर कदाचित वेगळं काही घडले असते. जे घडू शकते याचा विचार करत पक्षनेतृत्वाने अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ती मेहरबानी नव्हती तर पक्षाच्या अस्तित्वासाठी घेतलेली भूमिका होती असं सुनील तटकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवार