शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

राजकीय गरज ओळखा अन्...; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:50 IST

ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे.

नागपूर - जागावाटपाबाबत ३ पक्ष चर्चा करतात, बैठक सुरू असते तेव्हा आम्ही बाहेर बसलेलो असतो. आमची यादी आम्ही त्यांना दिलीय. आता त्यांनी आम्हाला कळवायचं आहे. जर युती झाली नाही तर आम्ही २७ मतदारसंघात फोकस करणार होतो ती यादी त्यांना दिली. गेल्या ३० वर्षाचं राजकारण हे तडजोडीचे होते. कुणी कुठे लढायचं हे फिक्स होते. ज्या मतदारसंघात ते लढले तिथे त्यांची ताकद आहे. आम्ही मोदींविरोधात जी कोंबडी शिजवली ती सगळ्यांनी मिळून खाल्ली पाहिजे. आज शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी शरद पवार केवळ नोंदणीकृत पक्ष आहे. परंतु त्यांना ओळख निर्माण करायचीय. त्यासाठी ठराविक मते आणि लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. त्यामुळे ही गरज त्यांची आहे तशी आमचीही आहे. त्या गरजेला ओळखून वाटाघाटी झाल्या पाहिजेत असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला २ मतदारसंघात ताकद उभी करता आली नाही. ४६ मतदारसंघात ताकदीने आहोत. आम्ही अडीच लाखाच्या आसपास मते आमच्याकडे आहेत. भाजपाला टार्गेट आमच्याशिवाय कुणी करत नाही. ज्या दिवशी मी जाहीर करेन तेव्हा लक्षात येईल. महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यात ३ पक्ष चर्चेला बसतात. त्यांची चर्चा झाल्यानंतर वंचितला बोलवतात. आम्ही वंचित आहोत, उपरे आहोत. बैठकीतही उपरे आहोत. बैठकीतील चर्चेत बोलवल्यावर सहभागी होतो. मी राजकीय वस्तूस्थिती मांडतोय. माझ्याकडे ४८ उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस-भाजपाने आम्हाला नुकसान पोहचवलं, मुस्लीम मतदार त्यांच्याकडे गेले. दलित-मागासवर्गीय मतदार आमच्याकडे वळाले. त्यामुळे गरज ओळखून जागावाटपाची चर्चा करा. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले. 

तसेच ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे मी आघाडीत राहावे असं काँग्रेसला वाटते. मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आम्ही किमान ६ जागा जिंकू शकतो. आमचा राजकीय अजेंडा नाही. सामाजिक परिवर्तन हा आमचा अजेंडा आहे असंही आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, जरांगे पाटील यांच्यामुळे जे आंदोलन उभं राहिले त्यामुळे ओबीसी जागरुक झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आतापर्यंत निजामी मराठा यांची पाठराखण केली आहे. असेच जर झाले तर हा जागरुक झालेला ओबीसी हा भाजपाच्या दिशेने जाईल. जर असं करायचं नसेल तर भाजपाविरोधात बनलेली आघाडी ही घराणेशाहीला पोसत नाही. काही कुटुंबाला पोसत नाही. कुठल्या जातीव्यवस्थेला पोसत नाही हे पटवून द्यायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये किमान १५ उमेदवार ओबीसी हवेत. आतापर्यंत एकच माळी समाजाचा धरला तर उरलेल्या कुठल्याही समाजाचा खासदार झालेला नाही. भाजपा काही जणांना वगळून राजकारण करते, विशेषत: अल्पसंख्याकांना वगळून राजकारण करते. त्यामुळे उमेदवार यादीत किमान ३ उमेदवार हे अल्पसंख्याक असले पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBJPभाजपा