शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय गरज ओळखा अन्...; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:50 IST

ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे.

नागपूर - जागावाटपाबाबत ३ पक्ष चर्चा करतात, बैठक सुरू असते तेव्हा आम्ही बाहेर बसलेलो असतो. आमची यादी आम्ही त्यांना दिलीय. आता त्यांनी आम्हाला कळवायचं आहे. जर युती झाली नाही तर आम्ही २७ मतदारसंघात फोकस करणार होतो ती यादी त्यांना दिली. गेल्या ३० वर्षाचं राजकारण हे तडजोडीचे होते. कुणी कुठे लढायचं हे फिक्स होते. ज्या मतदारसंघात ते लढले तिथे त्यांची ताकद आहे. आम्ही मोदींविरोधात जी कोंबडी शिजवली ती सगळ्यांनी मिळून खाल्ली पाहिजे. आज शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी शरद पवार केवळ नोंदणीकृत पक्ष आहे. परंतु त्यांना ओळख निर्माण करायचीय. त्यासाठी ठराविक मते आणि लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. त्यामुळे ही गरज त्यांची आहे तशी आमचीही आहे. त्या गरजेला ओळखून वाटाघाटी झाल्या पाहिजेत असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला २ मतदारसंघात ताकद उभी करता आली नाही. ४६ मतदारसंघात ताकदीने आहोत. आम्ही अडीच लाखाच्या आसपास मते आमच्याकडे आहेत. भाजपाला टार्गेट आमच्याशिवाय कुणी करत नाही. ज्या दिवशी मी जाहीर करेन तेव्हा लक्षात येईल. महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यात ३ पक्ष चर्चेला बसतात. त्यांची चर्चा झाल्यानंतर वंचितला बोलवतात. आम्ही वंचित आहोत, उपरे आहोत. बैठकीतही उपरे आहोत. बैठकीतील चर्चेत बोलवल्यावर सहभागी होतो. मी राजकीय वस्तूस्थिती मांडतोय. माझ्याकडे ४८ उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस-भाजपाने आम्हाला नुकसान पोहचवलं, मुस्लीम मतदार त्यांच्याकडे गेले. दलित-मागासवर्गीय मतदार आमच्याकडे वळाले. त्यामुळे गरज ओळखून जागावाटपाची चर्चा करा. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले. 

तसेच ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे मी आघाडीत राहावे असं काँग्रेसला वाटते. मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आम्ही किमान ६ जागा जिंकू शकतो. आमचा राजकीय अजेंडा नाही. सामाजिक परिवर्तन हा आमचा अजेंडा आहे असंही आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, जरांगे पाटील यांच्यामुळे जे आंदोलन उभं राहिले त्यामुळे ओबीसी जागरुक झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आतापर्यंत निजामी मराठा यांची पाठराखण केली आहे. असेच जर झाले तर हा जागरुक झालेला ओबीसी हा भाजपाच्या दिशेने जाईल. जर असं करायचं नसेल तर भाजपाविरोधात बनलेली आघाडी ही घराणेशाहीला पोसत नाही. काही कुटुंबाला पोसत नाही. कुठल्या जातीव्यवस्थेला पोसत नाही हे पटवून द्यायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये किमान १५ उमेदवार ओबीसी हवेत. आतापर्यंत एकच माळी समाजाचा धरला तर उरलेल्या कुठल्याही समाजाचा खासदार झालेला नाही. भाजपा काही जणांना वगळून राजकारण करते, विशेषत: अल्पसंख्याकांना वगळून राजकारण करते. त्यामुळे उमेदवार यादीत किमान ३ उमेदवार हे अल्पसंख्याक असले पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBJPभाजपा