शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

राजकीय गरज ओळखा अन्...; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:50 IST

ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे.

नागपूर - जागावाटपाबाबत ३ पक्ष चर्चा करतात, बैठक सुरू असते तेव्हा आम्ही बाहेर बसलेलो असतो. आमची यादी आम्ही त्यांना दिलीय. आता त्यांनी आम्हाला कळवायचं आहे. जर युती झाली नाही तर आम्ही २७ मतदारसंघात फोकस करणार होतो ती यादी त्यांना दिली. गेल्या ३० वर्षाचं राजकारण हे तडजोडीचे होते. कुणी कुठे लढायचं हे फिक्स होते. ज्या मतदारसंघात ते लढले तिथे त्यांची ताकद आहे. आम्ही मोदींविरोधात जी कोंबडी शिजवली ती सगळ्यांनी मिळून खाल्ली पाहिजे. आज शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी शरद पवार केवळ नोंदणीकृत पक्ष आहे. परंतु त्यांना ओळख निर्माण करायचीय. त्यासाठी ठराविक मते आणि लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. त्यामुळे ही गरज त्यांची आहे तशी आमचीही आहे. त्या गरजेला ओळखून वाटाघाटी झाल्या पाहिजेत असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला २ मतदारसंघात ताकद उभी करता आली नाही. ४६ मतदारसंघात ताकदीने आहोत. आम्ही अडीच लाखाच्या आसपास मते आमच्याकडे आहेत. भाजपाला टार्गेट आमच्याशिवाय कुणी करत नाही. ज्या दिवशी मी जाहीर करेन तेव्हा लक्षात येईल. महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यात ३ पक्ष चर्चेला बसतात. त्यांची चर्चा झाल्यानंतर वंचितला बोलवतात. आम्ही वंचित आहोत, उपरे आहोत. बैठकीतही उपरे आहोत. बैठकीतील चर्चेत बोलवल्यावर सहभागी होतो. मी राजकीय वस्तूस्थिती मांडतोय. माझ्याकडे ४८ उमेदवार आहेत. गेल्यावेळी काँग्रेस-भाजपाने आम्हाला नुकसान पोहचवलं, मुस्लीम मतदार त्यांच्याकडे गेले. दलित-मागासवर्गीय मतदार आमच्याकडे वळाले. त्यामुळे गरज ओळखून जागावाटपाची चर्चा करा. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितले. 

तसेच ठाकरेंचे मतदार काँग्रेसकडे वळतील का याबाबत सांशकता आहे. हा मतदार आमच्यापेक्षा भाजपाकडे वळू शकतो ही काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे मी आघाडीत राहावे असं काँग्रेसला वाटते. मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. आम्ही किमान ६ जागा जिंकू शकतो. आमचा राजकीय अजेंडा नाही. सामाजिक परिवर्तन हा आमचा अजेंडा आहे असंही आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, जरांगे पाटील यांच्यामुळे जे आंदोलन उभं राहिले त्यामुळे ओबीसी जागरुक झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आतापर्यंत निजामी मराठा यांची पाठराखण केली आहे. असेच जर झाले तर हा जागरुक झालेला ओबीसी हा भाजपाच्या दिशेने जाईल. जर असं करायचं नसेल तर भाजपाविरोधात बनलेली आघाडी ही घराणेशाहीला पोसत नाही. काही कुटुंबाला पोसत नाही. कुठल्या जातीव्यवस्थेला पोसत नाही हे पटवून द्यायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये किमान १५ उमेदवार ओबीसी हवेत. आतापर्यंत एकच माळी समाजाचा धरला तर उरलेल्या कुठल्याही समाजाचा खासदार झालेला नाही. भाजपा काही जणांना वगळून राजकारण करते, विशेषत: अल्पसंख्याकांना वगळून राजकारण करते. त्यामुळे उमेदवार यादीत किमान ३ उमेदवार हे अल्पसंख्याक असले पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBJPभाजपा