शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:48 IST

Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला.

Harshvardhan Patil News: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात उडी मारणार अशा चर्चा आहेत. हर्षवर्धन पाटील त्याबद्दल सूचक संकेत देताना दिसत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत इंदापूर निवडणुकीबद्दल भाष्य केले. त्याचबरोबर ८४ आमदारांच्या निलंबनाचा एक किस्साही सांगितला. 

हर्षवर्धन पाटील यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी अजित पवारांसोबतचे राजकीय वैर आणि अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक आल्यानंतरच्या आठवणी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "राजकारण हे समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला असे वाटते की लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. तो आपला सगळ्याच पक्षांशी असतो. राहिलाच पाहिजे. जेव्हा राजकीय मते व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाची आपली भूमिका ठरलेली असते."

'माझ्यावर अन्याय झाला की, इंदापूरची जनता...'

"माझ्यावर त्यावेळी अन्याय झाला. ज्या-ज्या वेळी माझ्यावर अन्याय होतो, त्यावेळी माझ्या तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते, हा मला अभिमान आहे. मला वयाच्या ३१ व्या वर्षी इंदापूरच्या जनतेने आमदार केले. आमदारकीची शपथ घेण्याअगोदर मला राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा योग आला", अशी आठवण हर्षवर्धन पाटलांनी सांगितली.   

"मी त्या काळातील सर्वात तरुण मंत्री होतो. सलग चार वेळा म्हणजे १७-१८ वर्षे. पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मला खूप शिकता आले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख... या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर अतिशय सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध मी प्रस्थापित केले. मी राजकारणात कायम अॅसेट म्हणून काम केले", असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

हर्षवर्धन पाटलांना का म्हणायचे निलंबन मंत्री?

"मला असे वाटते की तो काळ राजकारणाचा सुवर्णकाळ होता. धोरणात्मक निर्णय व्हायचे. मी संसदीय कार्यमंत्री होतो. मला तर निलंबन मंत्री म्हणायचे. मी सभागृहात एन्ट्री केली की, म्हणायचे आले, निलंबन मंत्री. मी ८४ आमदारांना निलंबित केलेले १० वर्षाच्या काळात. त्यावेळी कटुपणा घ्यावा लागायचा. वाईटपणा घ्यावा लागायचा. आता मी ज्या पक्षात आहे, त्यातील काही लोकांना निलंबित करावे लागले", असा किस्सा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपा