शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:48 IST

Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला.

Harshvardhan Patil News: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात उडी मारणार अशा चर्चा आहेत. हर्षवर्धन पाटील त्याबद्दल सूचक संकेत देताना दिसत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत इंदापूर निवडणुकीबद्दल भाष्य केले. त्याचबरोबर ८४ आमदारांच्या निलंबनाचा एक किस्साही सांगितला. 

हर्षवर्धन पाटील यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी अजित पवारांसोबतचे राजकीय वैर आणि अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक आल्यानंतरच्या आठवणी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "राजकारण हे समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला असे वाटते की लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. तो आपला सगळ्याच पक्षांशी असतो. राहिलाच पाहिजे. जेव्हा राजकीय मते व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाची आपली भूमिका ठरलेली असते."

'माझ्यावर अन्याय झाला की, इंदापूरची जनता...'

"माझ्यावर त्यावेळी अन्याय झाला. ज्या-ज्या वेळी माझ्यावर अन्याय होतो, त्यावेळी माझ्या तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते, हा मला अभिमान आहे. मला वयाच्या ३१ व्या वर्षी इंदापूरच्या जनतेने आमदार केले. आमदारकीची शपथ घेण्याअगोदर मला राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा योग आला", अशी आठवण हर्षवर्धन पाटलांनी सांगितली.   

"मी त्या काळातील सर्वात तरुण मंत्री होतो. सलग चार वेळा म्हणजे १७-१८ वर्षे. पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मला खूप शिकता आले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख... या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर अतिशय सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध मी प्रस्थापित केले. मी राजकारणात कायम अॅसेट म्हणून काम केले", असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

हर्षवर्धन पाटलांना का म्हणायचे निलंबन मंत्री?

"मला असे वाटते की तो काळ राजकारणाचा सुवर्णकाळ होता. धोरणात्मक निर्णय व्हायचे. मी संसदीय कार्यमंत्री होतो. मला तर निलंबन मंत्री म्हणायचे. मी सभागृहात एन्ट्री केली की, म्हणायचे आले, निलंबन मंत्री. मी ८४ आमदारांना निलंबित केलेले १० वर्षाच्या काळात. त्यावेळी कटुपणा घ्यावा लागायचा. वाईटपणा घ्यावा लागायचा. आता मी ज्या पक्षात आहे, त्यातील काही लोकांना निलंबित करावे लागले", असा किस्सा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपा