शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:48 IST

Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला.

Harshvardhan Patil News: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात उडी मारणार अशा चर्चा आहेत. हर्षवर्धन पाटील त्याबद्दल सूचक संकेत देताना दिसत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत इंदापूर निवडणुकीबद्दल भाष्य केले. त्याचबरोबर ८४ आमदारांच्या निलंबनाचा एक किस्साही सांगितला. 

हर्षवर्धन पाटील यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी अजित पवारांसोबतचे राजकीय वैर आणि अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक आल्यानंतरच्या आठवणी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "राजकारण हे समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला असे वाटते की लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. तो आपला सगळ्याच पक्षांशी असतो. राहिलाच पाहिजे. जेव्हा राजकीय मते व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाची आपली भूमिका ठरलेली असते."

'माझ्यावर अन्याय झाला की, इंदापूरची जनता...'

"माझ्यावर त्यावेळी अन्याय झाला. ज्या-ज्या वेळी माझ्यावर अन्याय होतो, त्यावेळी माझ्या तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते, हा मला अभिमान आहे. मला वयाच्या ३१ व्या वर्षी इंदापूरच्या जनतेने आमदार केले. आमदारकीची शपथ घेण्याअगोदर मला राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा योग आला", अशी आठवण हर्षवर्धन पाटलांनी सांगितली.   

"मी त्या काळातील सर्वात तरुण मंत्री होतो. सलग चार वेळा म्हणजे १७-१८ वर्षे. पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मला खूप शिकता आले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख... या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर अतिशय सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध मी प्रस्थापित केले. मी राजकारणात कायम अॅसेट म्हणून काम केले", असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

हर्षवर्धन पाटलांना का म्हणायचे निलंबन मंत्री?

"मला असे वाटते की तो काळ राजकारणाचा सुवर्णकाळ होता. धोरणात्मक निर्णय व्हायचे. मी संसदीय कार्यमंत्री होतो. मला तर निलंबन मंत्री म्हणायचे. मी सभागृहात एन्ट्री केली की, म्हणायचे आले, निलंबन मंत्री. मी ८४ आमदारांना निलंबित केलेले १० वर्षाच्या काळात. त्यावेळी कटुपणा घ्यावा लागायचा. वाईटपणा घ्यावा लागायचा. आता मी ज्या पक्षात आहे, त्यातील काही लोकांना निलंबित करावे लागले", असा किस्सा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपा