शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"अजित पवारांसह आमदारांच्या अपात्रतेबाबत मला माहिती नाही, 'तो' निर्णय जयंत पाटलांचा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:12 IST

पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत अशी तीव्र नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

सातारा – अजित पवारांसह ९ राष्ट्रवादी आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर रातोरात पक्षाकडून या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षांना पक्षाकडून पत्र देण्यात आले. या सर्व घडामोडीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही अपात्रतेच्या भानगडीत पडणार नाही. कुठली कारवाई करणार नाही. आम्ही जनतेत जाणार असं म्हटल्याने राष्ट्रवादीत २ मत प्रवाह असल्याचे समोर आले.

सातारा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना पत्रकारांनी ही माहिती दिल्यानंतर ते म्हणाले की, मी आज सकाळपासून बाहेर पडलोय. पक्षाच्या विधिमंडळाचे सर्व अधिकार नेते म्हणून पहिल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अपात्र करायचा की नाही हा अधिकार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. जयंत पाटील हे पक्षाचे शिस्तबद्ध, कायदा जाणणारे नेते आहेत. त्यांनी अपात्रतेबाबत काही निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पक्षाची घटना आणि नियम पाहूनच ते काम करतात असं पवारांनी स्पष्ट केले. 

तसेच महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाणसाहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप शरद पवार यांनी केला.

...ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू  

मी पंतप्रधानांचे वक्तव्य ऐकलं. ते राष्ट्रवादी काँग्रेसबाबत होते, राष्ट्रवादीचे सहकारी भ्रष्टाचारात सहभागी झालेत असं मोदी म्हणाले. राज्य सहकारी बँक, सिंचन विभागातील गोष्टींचा उल्लेख केला. आज त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळात सहभागी झाले. म्हणजे पंतप्रधानांचे आरोप वास्तव्य नव्हते. ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. त्याचा मला आनंद आहे असंही शरद पवार म्हणाले.

जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत

आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत अशी तीव्र नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील