शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:51 IST

माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरे झाले, मला चालवता आला नसता. - सुप्रिया सुळे

राजकारणात मी सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. तेव्हा आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे, अजित पवार ही यायचे. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

2013/14 साली लोक सत्ता असताना आपल्याला नाकारत होते. भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जोपर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली होते तोपर्यंत भाजप होता. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा फक्त शरद पवारांनी चालवला आहे. जे दोन गट झाले आहेत त्यांच्याशी लढा आहे. माझी आई आम्हाला सत्तेत असताना सांगायची महागाई वाढत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आज काय महाग नाही ते सांगा. याला अदृश्य शक्ती जबाबदार आहे, अशी टीका सुळे यांनी केली. 

आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज ना खाऊंगा, ना खाने दुंगाचे काय झाले? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा. समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले त्याचे काय झाले? सकाळी 6 वाजता ईडी सीबीआयचे छापे मारले. नवाब मलिक, संजय राऊत, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांनी काय केले. सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची इमानदारी आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला नाही चित केलं तर नाव सुप्रिया सुळे सांगणार नाही, असे आव्हान सुळे यांनी दिले. 

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी त्यांच्या मुलाला दिला होता. तो पक्ष कुणी घेतला त्यांचे बघा पुढे काय होतय ते कळेलच. 105 आमदार असलेला पक्ष होता भाजपा, आज काय आहे त्यांच्याकडे? प्रफुल्ल पटेल हरले होते तरी 2004 ला मंत्री केलेले. 9 खासदार असताना अडीच वर्षे मंत्रिपदी होते. सेनेचे 18 खासदार असताना एक मंत्रिपद दिले होते, असे सुळे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीवर डीसीएम १ असे लिहलेले असते. आमचे 105 आमदार असते तर आम्ही काय नसते सोडले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले. ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस यांना त्रास दिला जातोय. ज्यांचे नाव कुणाला माहिती नसते असे मुख्यमंत्री त्यांना लागतात. योगी आदित्यनाथ सोडून एक नाव सांगा.  मला वाटलं होतं सगळं संपले पण लढायला मजा येतेय. माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरे झाले, मला चालवता आला नसता. एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केलं गल्लत होते असे आज होताना दिसते, असा टोलाही सुळे यांनी लगावला. 

भाजप महिलाच्या विरोधात आहे. वंदना आणि फौजिया खान या चांगल्या खासदार आहेत असे उपराष्ट्रपती म्हणतात. या दोघींनी मणिपूर महिलांच्या बाजूने मतदान केले म्हणून त्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोपही सुळे यांनी केला आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस