शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:28 IST

जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत.

जम्मू - जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवलं आहे. याठिकाणी फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सनं ४१ जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसनं ६ जागा जिंकल्या. भाजपाने जम्मू काश्मीरात २९ जागा जिंकल्या असून पीडीपीने ४ आणि अपक्ष ७ आमदार निवडून आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ५० वर्षापासून सक्रीय असलेल्या शिवसेना संघटनेने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. 

महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे उमेदवार उतरवले होते. निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९ उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढले होते.

जम्मू काश्मीरात ठाकरेंच्या उमेदवाराला किती मते मिळाली?

डोडा वेस्ट मतदारसंघ - उमेदवार टिळक राज शान - मते १६२जम्मू वेस्ट मतदारसंघ - उमेदवार मिनाश्री चिब्बेर - मते १२६कालाकोट मतदारसंघ - उमेदवार राकेश कुमार - मते १२६बिश्नाह मतदारसंघ - उमेदवार जय भारत - मते ४७५जसरोटा मतदारसंघ - उमेदवार राजेश कुमार - मते १०४रामनगर मतदारसंघ - उमेदवार राज सिंग - मते ७१४उधमपूर ईस्ट मतदारसंघ - उमेदवार साहिल गंडोत्रा - मते ३९७ उधमपूर वेस्ट मतदारसंघ - उमेदवार संजीव कुमार - मते १७०भदरवाह मतदारसंघ - उमेदवार विनोद कुमार - मते १६५

भाजपानं रचला इतिहास

कलम ३७० हटवण्याचा मुद्दा पुढे करत जम्मू काश्मीरात भाजपानं गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली. मागील निवडणुकीत या राज्यात भाजपानं २५ जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदाच्या निवडणुकीत या जागांमध्ये वाढ झाली आहे. भाजपानं यावेळी २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्याशिवाय पक्षाच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे २००८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने भाजपा मतदारांच्या संख्येत वाढ होतानाचे चित्र दिसून येत आहे. २००८ साली भाजपाला १२.४५ टक्के मते मिळून ११ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी २२.९८ टक्के झाली त्यावेळी जागांच्या संख्येतही दुप्पट वाढ पाहायला मिळाली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाjammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा