शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला! मोदी-शाहंवरही निशाणा साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 15:19 IST

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली.

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून संपूर्ण ताकद लावून प्रचार केला जात आहे. यातच, महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात झाली आहे. यावरून राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली. ते माध्यमांसोबत बोलत होते.

महाविकास आघाडीच्या किती जागा येतील? -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह  येथे पुन्हा एकदा प्रचार करत आहेत. ते लोकसभेला जेथे जेथे फिरले होते, तेथे पराभव झाला होता, तेच चित्र यावेळीही असेल का? असा प्रश्न केला असता जयंत पाटील म्हणाले, "ते जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील." एवढेच नाही, तर 170 ते 180 च्या दरम्यान आमच्या (महाविकास आघाडी) जागा यायला हरकत नाही," असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी, आपला भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होतोना बघायला मिळतोय, कसे बघता याकडे? असे विचारले असता, "असे लोक म्हणता, मी आणखी म्हटलेलं नाही," असं एका वाक्यात उत्तर त्यांनी दिलं.

'एक है तो सेफ है' - पंतप्रधान मोदीएससी, एसटी आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप करीत 'एक है तो सेफ है', असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी दिला. 

सावरकर आणि बाळासाहेबांच्या प्रशंसेचे आव्हान - स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे असतानाही काँग्रेस त्यांची कधीच प्रशंसा करत नाही. त्यामुळे उद्धवसेनेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सार्वजनिक सभेत या दोघांची प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले. 

देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचे आहे - शाह२० तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे, त्यात तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. मी दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला. जिथे-जिथे गेलो, मग विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो. तेथे महायुती सरकार बनवायचे आहे आणि देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचे आहे, असं विधान भाजप नेते अमित शाह यांनी केले आहे. ते सांगलीतल्या शिराळा येथील सभेत बोलत होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAmit Shahअमित शाह