शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नीतीश कुमार एनडीएत कसे परतले?; विनोद तावडेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 19:01 IST

त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली असं विनोद तावडेंनी सांगितले.

मुंबई - Vinod Tawade in Bihar Political Crisis ( Marathi News ) नुकतेच बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या जेडीयूसोबतची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. या राजकीय सत्तानाट्यात बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाविरोधात इंडिया आघाडीचा नारा देणाऱ्या नीतीश कुमारांना भाजपाच्या बाजूने पुन्हा कसं आणलं याबाबत विनोद तावडेंनी पडद्यामागील कहाणी सांगितली आहे. 

विनोद तावडे म्हणाले की, नीतीश कुमार यांचे ४५ आमदार आले, आमचे ७८ आमदार आले तरीही भाजपाने नीतीश कुमारांना मुख्यमंत्रिपद दिले होते. पण त्यावेळी त्यांच्या मनात थोडी असुरक्षेची भावना होती. त्या काळात लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांना स्वप्न दाखवले. विरोधकांची आघाडी होईल आणि या आघाडीचे निमंत्रक होऊन तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा बनू शकता त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या. आता नीतीश कुमारांना ते पंतप्रधान म्हणून निवडून येऊ शकत नाही हे माहिती होते. पण तो चेहरा झाला तर त्या बळावर २०२४ ला निवडणूक होईल परंतु त्यानंतर २०२५ ची निवडणूक मला आरामात जिंकता येईल या विचाराने नीतीश कुमार यांनी आमची साथ सोडली आणि विरोधात गेले असं तावडेंनी सांगितले. 

मात्र या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे, सव्वा महिन्यापूर्वी बंगळुरूच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनवले. त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली. त्या परिस्थितीचा स्वाभाविकपणे आम्ही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी संवाद सुरू झाला. परंतु त्यावेळीही ते पुढे जात नव्हते. मात्र जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांचा पक्ष फोडायचा प्रयत्न केला, आमदार बाजूला घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवायचं प्लॅनिंग सुरू होते असा दावा विनोद तावडे यांनी केला. ABP माझाच्या विशेष मुलाखतीत विनोद तावडेंनी सत्तानाट्यामागील घडामोडींचा खुलासा केला. 

त्यात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवणे हे आम्हालाही चालणार नव्हते. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्हाला सत्तेत यायचे आहे तसे त्या राज्याचे हितही करायचे आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनले असते तर राज्यात गुंडाराज आला असता. तो आम्हाला येऊ द्यायचा नव्हता. तेव्हा आम्ही एकत्र येणार नाही असं म्हटलंय ना, असं राजकारणात करता येत नाही. राजकारणात सातत्याने बदलत्या स्थितीचा आढावा घेत तुमचा विचार कायम ठेवत पुढे जावे लागते ते आम्ही केले असं विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा