शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नीतीश कुमार एनडीएत कसे परतले?; विनोद तावडेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 19:01 IST

त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली असं विनोद तावडेंनी सांगितले.

मुंबई - Vinod Tawade in Bihar Political Crisis ( Marathi News ) नुकतेच बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या जेडीयूसोबतची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. या राजकीय सत्तानाट्यात बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाविरोधात इंडिया आघाडीचा नारा देणाऱ्या नीतीश कुमारांना भाजपाच्या बाजूने पुन्हा कसं आणलं याबाबत विनोद तावडेंनी पडद्यामागील कहाणी सांगितली आहे. 

विनोद तावडे म्हणाले की, नीतीश कुमार यांचे ४५ आमदार आले, आमचे ७८ आमदार आले तरीही भाजपाने नीतीश कुमारांना मुख्यमंत्रिपद दिले होते. पण त्यावेळी त्यांच्या मनात थोडी असुरक्षेची भावना होती. त्या काळात लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांना स्वप्न दाखवले. विरोधकांची आघाडी होईल आणि या आघाडीचे निमंत्रक होऊन तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा बनू शकता त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या. आता नीतीश कुमारांना ते पंतप्रधान म्हणून निवडून येऊ शकत नाही हे माहिती होते. पण तो चेहरा झाला तर त्या बळावर २०२४ ला निवडणूक होईल परंतु त्यानंतर २०२५ ची निवडणूक मला आरामात जिंकता येईल या विचाराने नीतीश कुमार यांनी आमची साथ सोडली आणि विरोधात गेले असं तावडेंनी सांगितले. 

मात्र या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे, सव्वा महिन्यापूर्वी बंगळुरूच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनवले. त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली. त्या परिस्थितीचा स्वाभाविकपणे आम्ही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी संवाद सुरू झाला. परंतु त्यावेळीही ते पुढे जात नव्हते. मात्र जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांचा पक्ष फोडायचा प्रयत्न केला, आमदार बाजूला घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवायचं प्लॅनिंग सुरू होते असा दावा विनोद तावडे यांनी केला. ABP माझाच्या विशेष मुलाखतीत विनोद तावडेंनी सत्तानाट्यामागील घडामोडींचा खुलासा केला. 

त्यात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवणे हे आम्हालाही चालणार नव्हते. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्हाला सत्तेत यायचे आहे तसे त्या राज्याचे हितही करायचे आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनले असते तर राज्यात गुंडाराज आला असता. तो आम्हाला येऊ द्यायचा नव्हता. तेव्हा आम्ही एकत्र येणार नाही असं म्हटलंय ना, असं राजकारणात करता येत नाही. राजकारणात सातत्याने बदलत्या स्थितीचा आढावा घेत तुमचा विचार कायम ठेवत पुढे जावे लागते ते आम्ही केले असं विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा