शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

नीतीश कुमार एनडीएत कसे परतले?; विनोद तावडेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 19:01 IST

त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली असं विनोद तावडेंनी सांगितले.

मुंबई - Vinod Tawade in Bihar Political Crisis ( Marathi News ) नुकतेच बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या जेडीयूसोबतची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. या राजकीय सत्तानाट्यात बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाविरोधात इंडिया आघाडीचा नारा देणाऱ्या नीतीश कुमारांना भाजपाच्या बाजूने पुन्हा कसं आणलं याबाबत विनोद तावडेंनी पडद्यामागील कहाणी सांगितली आहे. 

विनोद तावडे म्हणाले की, नीतीश कुमार यांचे ४५ आमदार आले, आमचे ७८ आमदार आले तरीही भाजपाने नीतीश कुमारांना मुख्यमंत्रिपद दिले होते. पण त्यावेळी त्यांच्या मनात थोडी असुरक्षेची भावना होती. त्या काळात लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांना स्वप्न दाखवले. विरोधकांची आघाडी होईल आणि या आघाडीचे निमंत्रक होऊन तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा बनू शकता त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या. आता नीतीश कुमारांना ते पंतप्रधान म्हणून निवडून येऊ शकत नाही हे माहिती होते. पण तो चेहरा झाला तर त्या बळावर २०२४ ला निवडणूक होईल परंतु त्यानंतर २०२५ ची निवडणूक मला आरामात जिंकता येईल या विचाराने नीतीश कुमार यांनी आमची साथ सोडली आणि विरोधात गेले असं तावडेंनी सांगितले. 

मात्र या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे, सव्वा महिन्यापूर्वी बंगळुरूच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनवले. त्याठिकाणी नीतीश कुमारांना जाणीव झाली या लोकांनी आपला वापर केला. त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली. त्या परिस्थितीचा स्वाभाविकपणे आम्ही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी संवाद सुरू झाला. परंतु त्यावेळीही ते पुढे जात नव्हते. मात्र जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नीतीश कुमारांचा पक्ष फोडायचा प्रयत्न केला, आमदार बाजूला घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवायचं प्लॅनिंग सुरू होते असा दावा विनोद तावडे यांनी केला. ABP माझाच्या विशेष मुलाखतीत विनोद तावडेंनी सत्तानाट्यामागील घडामोडींचा खुलासा केला. 

त्यात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवणे हे आम्हालाही चालणार नव्हते. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्हाला सत्तेत यायचे आहे तसे त्या राज्याचे हितही करायचे आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनले असते तर राज्यात गुंडाराज आला असता. तो आम्हाला येऊ द्यायचा नव्हता. तेव्हा आम्ही एकत्र येणार नाही असं म्हटलंय ना, असं राजकारणात करता येत नाही. राजकारणात सातत्याने बदलत्या स्थितीचा आढावा घेत तुमचा विचार कायम ठेवत पुढे जावे लागते ते आम्ही केले असं विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा