शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

बेघर, भिकारी यांनीही देशासाठी काम करावे - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:29 IST

मुंबईतील बेघर, भिकारी यांना एनजीओद्वारे सीलबंद अन्न वाटले जाते, तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिनही पुरवण्यात येतात, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आणखी आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.     

मुंबई : बेघर, भिकारी यांनीही देशासाठी काहीतरी करावे, राज्य सरकार त्यांना सर्व पुरवणार नाही, असे उच्च न्यायालयाने शनिवारी म्हटले.मुंबईतील बेघर, भिकारी व गरजू लोकांना दिवसातून तीन वेळा सकस आहार, पिण्यायोग्य पाणी, निवारा आणि स्वच्छ शौचालय इत्यादी सुविधा पुरवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ब्रिजेश आर्या यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ही याचिका निकाली काढताना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वरील विधान केले. (Homeless beggars should also work for the country - High Court)मुंबईतील बेघर, भिकारी यांना एनजीओद्वारे सीलबंद अन्न वाटले जाते, तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिनही पुरवण्यात येतात, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आणखी आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.     ‘त्यांनीही (बेघर, भिकारी) देशासाठी काहीतरी काम करावे. सर्वच करत आहेत. राज्य सरकार त्यांना सर्व पुरवणार नाही. तुम्ही (याचिकाकर्ते) केवळ या वर्गातील लोकांची संख्या वाढवत आहात. याचिकेतील सर्व मागण्या मान्य केल्या, तर लोकांना काम न करण्याची आवश्यकता नाही. बेरोजगारीला एक प्रकारे आमंत्रण दिले जाईल, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टCourtन्यायालयBeggarभिकारी