शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फडणवीसांच्या काळातील फोन टॅपिंगची चौकशी करणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:51 IST

केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात २०१६-१७ या काळात माझे फोन टॅप झाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, तत्कालीन खासदार संजय काकडे यांचेही फोन टॅप झाले असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ सदस्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. त्यावर, सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करताना पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांमार्फत फोन टॅपिंग केले गेले असा आरोप केला.फोन नंबर माझा होता पण नाव एका अमजद खान या व्यक्तीचे दिले गेले आणि ही व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करते असे सांगून टॅपिंगची परवानगी घेण्यात आली होती. मी अमली पदार्थांची तस्करी करतो असा अहवाल दिला गेल्याचे पटोले म्हणाले. या टॅपिंगची परवानगी कोणी दिली होती असा सवाल त्यांनी केला. त्यावर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक यांच्या पातळीवर ती दिली जाते, मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जात नाही असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. इतके वरिष्ठ अधिकारी या विषयाशी संबंधित असल्याने मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय एजन्सींकडून चौकशी करा : पाटीलकाही केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील