शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

फडणवीसांच्या काळातील फोन टॅपिंगची चौकशी करणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:51 IST

केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात २०१६-१७ या काळात माझे फोन टॅप झाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, तत्कालीन खासदार संजय काकडे यांचेही फोन टॅप झाले असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ सदस्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. त्यावर, सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करताना पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांमार्फत फोन टॅपिंग केले गेले असा आरोप केला.फोन नंबर माझा होता पण नाव एका अमजद खान या व्यक्तीचे दिले गेले आणि ही व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करते असे सांगून टॅपिंगची परवानगी घेण्यात आली होती. मी अमली पदार्थांची तस्करी करतो असा अहवाल दिला गेल्याचे पटोले म्हणाले. या टॅपिंगची परवानगी कोणी दिली होती असा सवाल त्यांनी केला. त्यावर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक यांच्या पातळीवर ती दिली जाते, मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जात नाही असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. इतके वरिष्ठ अधिकारी या विषयाशी संबंधित असल्याने मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय एजन्सींकडून चौकशी करा : पाटीलकाही केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील