शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Hinganghat Burn Case: काँग्रेस नेत्याची अहिंसेची 'शिकवण'; 'कठोर कायद्यानेही नराधम थांबले नाहीत, त्याऐवजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 17:08 IST

निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत.

ठळक मुद्दे कडक व तीव्र गतीने शासन देण्याबरोबरच समाजातील हिंसेचे चक्र मोडले पाहिजेहिंसक वक्तव्ये वा पक्षीय धोरणे ही कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजेनिर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत

मुंबई - हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होऊ लागली आहे. या घटनेला आरोपीला फाशावर लटकवा अशी तीव्र मागणी लोकांकडून होत आहे. यातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत. समाजातील हिंसेचे चक्र मोडून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. 

याबाबत सचिन सावंत यांनी ट्विट करुन सांगितले की, प्रत्येकवेळी हिंगणघाट सारखी घटना होते त्यावेळी तात्काळ कडक शासन, फाशीची शिक्षा वा एन्काऊंटर सारख्या मागण्या आपण करतो. निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत. कडक व तीव्र गतीने शासन देण्याबरोबरच समाजातील हिंसेचे चक्र मोडले पाहिजे असं ते म्हणाले 

त्याचसोबत करुणा, प्रेम, परस्परादर, सद्भावना व अहिंसा यांची शिकवण अभ्यासक्रम व सामाजिक चळवळीतून दिली गेली पाहिजे. राजकीय प्रक्रियेतून येणारी हिंसक वक्तव्ये वा पक्षीय धोरणे ही कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजे. चांगला नागरिक बनण्यासाठी गांधीजींकडेच व अध्यात्मिक प्रगतीमध्ये याचा उपाय आहे अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

...त्यापेक्षा तुला 'निर्भया' नाव ठेवणं आम्हाला सोयीचं वाटतं; शालिनी ठाकरेंचं उपरोधिक पत्र

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत. या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण  समजू शकतो. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

आज ती जळाली नाही समाज व्यवस्थेचा बुरखा जळाला"

अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

 'त्या' नराधमाला कडक शिक्षा होईल : जयंत पाटील

"ताई तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे"

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतHinganghatहिंगणघाटfireआगPoliceपोलिसNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपMahatma Gandhiमहात्मा गांधी