शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Hinganghat Burn Case: काँग्रेस नेत्याची अहिंसेची 'शिकवण'; 'कठोर कायद्यानेही नराधम थांबले नाहीत, त्याऐवजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 17:08 IST

निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत.

ठळक मुद्दे कडक व तीव्र गतीने शासन देण्याबरोबरच समाजातील हिंसेचे चक्र मोडले पाहिजेहिंसक वक्तव्ये वा पक्षीय धोरणे ही कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजेनिर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत

मुंबई - हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होऊ लागली आहे. या घटनेला आरोपीला फाशावर लटकवा अशी तीव्र मागणी लोकांकडून होत आहे. यातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत. समाजातील हिंसेचे चक्र मोडून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. 

याबाबत सचिन सावंत यांनी ट्विट करुन सांगितले की, प्रत्येकवेळी हिंगणघाट सारखी घटना होते त्यावेळी तात्काळ कडक शासन, फाशीची शिक्षा वा एन्काऊंटर सारख्या मागण्या आपण करतो. निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत. कडक व तीव्र गतीने शासन देण्याबरोबरच समाजातील हिंसेचे चक्र मोडले पाहिजे असं ते म्हणाले 

त्याचसोबत करुणा, प्रेम, परस्परादर, सद्भावना व अहिंसा यांची शिकवण अभ्यासक्रम व सामाजिक चळवळीतून दिली गेली पाहिजे. राजकीय प्रक्रियेतून येणारी हिंसक वक्तव्ये वा पक्षीय धोरणे ही कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजे. चांगला नागरिक बनण्यासाठी गांधीजींकडेच व अध्यात्मिक प्रगतीमध्ये याचा उपाय आहे अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

...त्यापेक्षा तुला 'निर्भया' नाव ठेवणं आम्हाला सोयीचं वाटतं; शालिनी ठाकरेंचं उपरोधिक पत्र

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत. या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण  समजू शकतो. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

आज ती जळाली नाही समाज व्यवस्थेचा बुरखा जळाला"

अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

 'त्या' नराधमाला कडक शिक्षा होईल : जयंत पाटील

"ताई तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे"

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतHinganghatहिंगणघाटfireआगPoliceपोलिसNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपMahatma Gandhiमहात्मा गांधी