शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शिवस्मारकाच्या उंचीवरून खडाजंगी, विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 6:25 AM

अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकीच असेल,

विशेष प्रतिनिधीमुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकीच असेल, अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उचलून धरला. या स्मारकाच्या निविदा राज्य सरकारने दिली आहे. यामध्ये महाराजांच्या पुतळ्याची उंची १६० मीटर वरून १२६ मीटर करण्यात आल्याचे समजते. महाराजांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखे आहे. पहिल्या प्रस्तावाला पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असताना, पुन्हा प्रस्ताव बदलण्याची गरज का भासली, असा सवाल पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार या ज्येष्ठ सदस्यांनी या विषयावर चर्चेची मागणी केली. दुसरीकडे भाजपाचे सदस्य आक्रमक होत पुढे आले.शिवरायांच्या स्मारकाचा निर्णय २००१ मध्ये झाला होता, पण त्यास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी २०१७ उजाडावे लागले. १५ वर्षांत तुम्ही काहीही केले नाही. चर्चाच करायची असेल, तर मग तुमच्या काळात शिवरायांवरील चित्रपट का निघाला नाही, रायगड, शिवनेरीसाठी तुम्ही काय केले, याचीही चर्चा करावी लागेल. हिंमत असेल तर चर्चा करा, असे आव्हान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देताच विरोधक अधिक आक्रमक होऊन घोषणा देऊ लागले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर राहणार असून विरोधकांनी स्मारकावरून राजकारण करू नये, असे मुनगंटीवार म्हणाले. तरीही गदारोळ सुरूच राहिल्याने अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आला अन् महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करता, याबद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय हा गंभीर विषय आहे. सरकारने असंवेदनशील दाखवत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप विखे पाटील यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या रचनेत बदल केला जात असल्याने पर्यावरण विभागाची नव्याने परवानगी घ्यावी लागणार असल्याने, स्मारकाचे काम रखडले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.पंतप्रधानांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. त्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला, तर जनता सरकारला माफ करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. आमच्या सरकारने स्मारकाचे काम पुढे नेले. तुम्ही काहीच केले नाही. त्यामुळे तुमच्या पोटात दुखते आहे. या विषयावर तरी राजकारण करू नका, असा टोला तावडे यांनी विरोधकांना हाणला.रचना व उंची गुणोत्तर प्रमाणातविरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले. विरोधकांची सत्ता असताना महाराजांच्या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली. केंद्रातही यांचीच सत्ता होती. मात्र, यांना स्मारकाची एकही वीट रचता आली नाही. हे सरकार जगातले सर्वात उंच स्मारक उभारणार आहे. या स्मारकाची रचना व त्याची उंची ही गुणोत्तर प्रमाणात ठरविण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र