शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 21:21 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत तब्बल ७१० मिमी पाऊस 

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २४ तासात तब्बल ७१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोकण गोव्यात वैभववाडी ७१०, मुंबई (कुलाबा) ३३०, उरण ३२०, रोहा ३००, भिरा २९०, पालघर २६०, माथेरान, श्रीवर्धन २४०, मंडणगड २३०, माणगाव, पनवेल, पेण २२०, मुरुड, सुधागड पाली २१०, म्हसाळा २००, महाड, पोलादपूर, ठाणे १८०, अलिबाग, दापोली १७०, पेडणे १५०, हर्णे १४०, बेलापूर, दोडामार्ग, कल्याण, वाडा १३०, चिपळूण, उल्हासनगर १२०, भिवंडी, कर्जत, खेड ११०, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात राधानगरी २३०, गगनबावडा २१०, महाबळेश्वर १९०, आजरा १८०, चांदगड १७०, लोणावळा १६०, वेल्हे १३०, कागल, पन्हाळा १२०, कोल्हापूर ११०, गडहिंग्लज, शाहूवाडी ९०, दिंडोरी ८०, भोर, पौड मुळशी, शिरपूर ७०, निफाड, पाटण ६० मिमी पाऊस पडला.याचवेळी घाटमाथ्यावरील ताम्हिणी ३३०, कोयना (नवजा) ३००, शिरगाव, डुंगरवाडी २८०, दावडी, अम्बोणे २७०, कोयना (पोफळी) १९०, लोणावळा (टाटा) १७०, खोपोली १४०, वळवण ११० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भात गोरेगाव १५०, आमगाव १२०, पारशिवनी ७०, गोंदिया, रामटेक, सौनेर, ६०, नागपूर, उमरेड ५० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात अंबड ३०, गंगाखेड, घनसावंगी, जाफराबाद, सेलू, उमरगा येथे २० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

कोकणात आणखी ५ दिवस पाऊसयाबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण आता कमी झाले असले तरी कोकणात पुढील ५ दिवस पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात कोकण वगळता इतरत्र ९ ऑगस्टपर्यंत पाऊस कमी राहील.त्यानंतर १०, ११ व १२ आॅगस्ट दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.७ व ८ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ़़़़़़़़़़़

महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १३० मिमी पाऊसगुुरुवारी दिवसभरात मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला असून महाबळेश्वरमध्ये सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (कुलाबा) ११, सांताक्रुझ २५, अलिबाग १४, जळगाव ११, पुणे ७, नाशिक ९ सातारा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.़़़़़़़़़़हवामान विभागाच्या अंदाजानुसार;  २४ तासात २०४ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटले जाते. वैभववाडी येथे अतिवृष्टीपेक्षा तिप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी चिन्नईमध्ये १ व २ डिसेंबर २०१५ मध्ये असाच विक्रमी पाऊस झाला होता़ त्यात जवळपास संपूर्ण चिन्नई शहर पाण्याखाली गेले होते़ मेघालयातील चेरापुंजी येथे देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी येथे १५ व १६ जून १९९५ मध्ये ४८ तासात तब्बल २ हजार ४९३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी