शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 21:21 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत तब्बल ७१० मिमी पाऊस 

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २४ तासात तब्बल ७१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोकण गोव्यात वैभववाडी ७१०, मुंबई (कुलाबा) ३३०, उरण ३२०, रोहा ३००, भिरा २९०, पालघर २६०, माथेरान, श्रीवर्धन २४०, मंडणगड २३०, माणगाव, पनवेल, पेण २२०, मुरुड, सुधागड पाली २१०, म्हसाळा २००, महाड, पोलादपूर, ठाणे १८०, अलिबाग, दापोली १७०, पेडणे १५०, हर्णे १४०, बेलापूर, दोडामार्ग, कल्याण, वाडा १३०, चिपळूण, उल्हासनगर १२०, भिवंडी, कर्जत, खेड ११०, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात राधानगरी २३०, गगनबावडा २१०, महाबळेश्वर १९०, आजरा १८०, चांदगड १७०, लोणावळा १६०, वेल्हे १३०, कागल, पन्हाळा १२०, कोल्हापूर ११०, गडहिंग्लज, शाहूवाडी ९०, दिंडोरी ८०, भोर, पौड मुळशी, शिरपूर ७०, निफाड, पाटण ६० मिमी पाऊस पडला.याचवेळी घाटमाथ्यावरील ताम्हिणी ३३०, कोयना (नवजा) ३००, शिरगाव, डुंगरवाडी २८०, दावडी, अम्बोणे २७०, कोयना (पोफळी) १९०, लोणावळा (टाटा) १७०, खोपोली १४०, वळवण ११० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भात गोरेगाव १५०, आमगाव १२०, पारशिवनी ७०, गोंदिया, रामटेक, सौनेर, ६०, नागपूर, उमरेड ५० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात अंबड ३०, गंगाखेड, घनसावंगी, जाफराबाद, सेलू, उमरगा येथे २० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

कोकणात आणखी ५ दिवस पाऊसयाबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण आता कमी झाले असले तरी कोकणात पुढील ५ दिवस पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात कोकण वगळता इतरत्र ९ ऑगस्टपर्यंत पाऊस कमी राहील.त्यानंतर १०, ११ व १२ आॅगस्ट दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.७ व ८ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ़़़़़़़़़़़

महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १३० मिमी पाऊसगुुरुवारी दिवसभरात मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला असून महाबळेश्वरमध्ये सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (कुलाबा) ११, सांताक्रुझ २५, अलिबाग १४, जळगाव ११, पुणे ७, नाशिक ९ सातारा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.़़़़़़़़़़हवामान विभागाच्या अंदाजानुसार;  २४ तासात २०४ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटले जाते. वैभववाडी येथे अतिवृष्टीपेक्षा तिप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी चिन्नईमध्ये १ व २ डिसेंबर २०१५ मध्ये असाच विक्रमी पाऊस झाला होता़ त्यात जवळपास संपूर्ण चिन्नई शहर पाण्याखाली गेले होते़ मेघालयातील चेरापुंजी येथे देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी येथे १५ व १६ जून १९९५ मध्ये ४८ तासात तब्बल २ हजार ४९३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी