शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

कोकणात दमदार, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग काही काळ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:43 AM

कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.

मुंबई/पुणे  -  कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.पुढील २४ तासांत दक्षिण कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर झाडांची पडझड झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कणकवली बाजारपेठेतील दुकानांत गटाराचे पाणी घुसले. त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान झाले.रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाले आहेत. राजापूर शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा, चिपळूण तालुक्यातील कापसाळ, खेड तालुक्यातील लोटेमाळ येथे वाहतूक ठप्प झाली होती.मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. बीड जिल्ह्यात नेकनूर मंडळात दोन तर पाली मंडळात दीड इंच पाऊस झाला. अंबाजोगाई, गेवराई, वडवणी, केज येथेही पावसाची नोंद झाली. परभणीतही पाऊस झाला.रेणापूर (जि. लातूर) तालुक्यात शनिवारी दुपारी रेणा नदीला जोडणाºया ओढ्याला पूर आल्याने त्यात बाळासाहेब पांडुरंग पवार हे वाहून गेले होते़ त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला.मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पुढील काहीदिवस अतिवृष्टी कायम राहणार आहे.

कोल्हापुरला दमदारकोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा सकाळी जोर कायम होता. दिवसभर पावसाची भुरभुर सुरूच होती. विदर्भाच्या वेशीवर!मान्सून विदर्भाच्या वेशीवर पोहोचला असून यवतमाळ व ब्रह्मपुरी येथे पाऊस झाला. मान्सून एक-दोन दिवसांत संपूर्ण विदर्भ व्यापेल. विदर्भातील भंडारा, कुही, नागपूर, रामटेक व सेलू येथे हलकासा पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र