शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

राज्यात उष्णतेचा कहर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:38 IST

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

मुंबई : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वात जास्त झळ विदर्भाला बसली, तेथील सर्व प्रमुख शहरांमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने वाढले आहे़ मराठवाड्यात उष्माघाताने चार जणांचा बळी गेल्याचे उघड झाले.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. हे राज्यातील आजवरचे सर्वाधिक तापमान आहे़ सर्वात कमी तापमान पुणे येथे २०़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उपराजधान नागपुरातील पारा ४५.५ अंशावर पोहोचला आहे. या झपाट्याने चढत असलेल्या तापमानामुळे विदर्भाची लाही-लाही होत आहे. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात उष्णतेची लाट कायम आहे़ पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यात उष्माघाताचे चार बळीमराठवाड्यात उष्माघाताने चौघांचा बळी घेतला. उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात या घटना घडल्या. लोहारा (जि. उस्मानाबाद) शहरातील सुतारकाम करणाऱ्या मंगेश दत्ता गाडीलोहार (२३) याचा सोमवारी सांयकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़ वसमत शहरातील (जि. हिंगोली)बालाजी नगर येथील सृष्टी खुडे (६) हिचा मंगळवारी उष्माघाताने मृत्यू झाला. तिला सोमवारी रात्रीपासून उलट्याचा त्रास सुरू झाला होता. मंगळवारी सकाळी ती बेशुद्ध झाली होती. नांदेडला उपचारासाठी नेत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. जालना जिल्ह्यातील अकोलादेव (ता. जाफराबाद) येथील लक्ष्मीबाई हरिभाऊ गवई (६५) यांचा मृत्यू झाला. तर परभणी जिल्ह्यातील (ता. पाथरी) बाभळगाव पेठ येथील दिव्या आव्हाड या चार महिन्याच्या बालिकेचा उष्मघाताने मृत्यू झाला. बंडु आव्हाड हे तिला पत्नीसह शेतामध्ये घेऊन गेले होते़ रात्री ताप आल्याने तिची शुद्ध हरपली. खाजगी हॉस्पीटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान :पुणे ४०़८, अहमदनगर ४४़३, जळगाव ४४़२, कोल्हापूर ४०़, महाबळेश्वर ३५़३, मालेगाव ४४़६, नाशिक ४०़१, सांगली ४१़४, सातारा ४१़६, सोलापूर ४३़८, मुंबई ३३, अलिबाग ३३़६, रत्नागिरी ३२़५, पणजी ३३़७, डहाणु ३३़९, उस्मानाबाद ४३़१, औरंगाबाद ४१़४, परभणी ४४़२, नांदेड ४४़४, अकोला ४४़९, अमरावती ४३़६, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४५़८, चंद्रपूर ४६़४, गोंदिया ४४, नागपूर ४५़५, वाशिम ४३, वर्धा ४५, यवतमाळ ४४़ (अंश सेल्सिअस)