शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

राज्यात उष्णतेचा कहर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:38 IST

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

मुंबई : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वात जास्त झळ विदर्भाला बसली, तेथील सर्व प्रमुख शहरांमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने वाढले आहे़ मराठवाड्यात उष्माघाताने चार जणांचा बळी गेल्याचे उघड झाले.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. हे राज्यातील आजवरचे सर्वाधिक तापमान आहे़ सर्वात कमी तापमान पुणे येथे २०़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उपराजधान नागपुरातील पारा ४५.५ अंशावर पोहोचला आहे. या झपाट्याने चढत असलेल्या तापमानामुळे विदर्भाची लाही-लाही होत आहे. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात उष्णतेची लाट कायम आहे़ पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यात उष्माघाताचे चार बळीमराठवाड्यात उष्माघाताने चौघांचा बळी घेतला. उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात या घटना घडल्या. लोहारा (जि. उस्मानाबाद) शहरातील सुतारकाम करणाऱ्या मंगेश दत्ता गाडीलोहार (२३) याचा सोमवारी सांयकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़ वसमत शहरातील (जि. हिंगोली)बालाजी नगर येथील सृष्टी खुडे (६) हिचा मंगळवारी उष्माघाताने मृत्यू झाला. तिला सोमवारी रात्रीपासून उलट्याचा त्रास सुरू झाला होता. मंगळवारी सकाळी ती बेशुद्ध झाली होती. नांदेडला उपचारासाठी नेत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. जालना जिल्ह्यातील अकोलादेव (ता. जाफराबाद) येथील लक्ष्मीबाई हरिभाऊ गवई (६५) यांचा मृत्यू झाला. तर परभणी जिल्ह्यातील (ता. पाथरी) बाभळगाव पेठ येथील दिव्या आव्हाड या चार महिन्याच्या बालिकेचा उष्मघाताने मृत्यू झाला. बंडु आव्हाड हे तिला पत्नीसह शेतामध्ये घेऊन गेले होते़ रात्री ताप आल्याने तिची शुद्ध हरपली. खाजगी हॉस्पीटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान :पुणे ४०़८, अहमदनगर ४४़३, जळगाव ४४़२, कोल्हापूर ४०़, महाबळेश्वर ३५़३, मालेगाव ४४़६, नाशिक ४०़१, सांगली ४१़४, सातारा ४१़६, सोलापूर ४३़८, मुंबई ३३, अलिबाग ३३़६, रत्नागिरी ३२़५, पणजी ३३़७, डहाणु ३३़९, उस्मानाबाद ४३़१, औरंगाबाद ४१़४, परभणी ४४़२, नांदेड ४४़४, अकोला ४४़९, अमरावती ४३़६, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४५़८, चंद्रपूर ४६़४, गोंदिया ४४, नागपूर ४५़५, वाशिम ४३, वर्धा ४५, यवतमाळ ४४़ (अंश सेल्सिअस)