शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्णतेचा कहर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:38 IST

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

मुंबई : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वात जास्त झळ विदर्भाला बसली, तेथील सर्व प्रमुख शहरांमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने वाढले आहे़ मराठवाड्यात उष्माघाताने चार जणांचा बळी गेल्याचे उघड झाले.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. हे राज्यातील आजवरचे सर्वाधिक तापमान आहे़ सर्वात कमी तापमान पुणे येथे २०़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उपराजधान नागपुरातील पारा ४५.५ अंशावर पोहोचला आहे. या झपाट्याने चढत असलेल्या तापमानामुळे विदर्भाची लाही-लाही होत आहे. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात उष्णतेची लाट कायम आहे़ पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यात उष्माघाताचे चार बळीमराठवाड्यात उष्माघाताने चौघांचा बळी घेतला. उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात या घटना घडल्या. लोहारा (जि. उस्मानाबाद) शहरातील सुतारकाम करणाऱ्या मंगेश दत्ता गाडीलोहार (२३) याचा सोमवारी सांयकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़ वसमत शहरातील (जि. हिंगोली)बालाजी नगर येथील सृष्टी खुडे (६) हिचा मंगळवारी उष्माघाताने मृत्यू झाला. तिला सोमवारी रात्रीपासून उलट्याचा त्रास सुरू झाला होता. मंगळवारी सकाळी ती बेशुद्ध झाली होती. नांदेडला उपचारासाठी नेत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. जालना जिल्ह्यातील अकोलादेव (ता. जाफराबाद) येथील लक्ष्मीबाई हरिभाऊ गवई (६५) यांचा मृत्यू झाला. तर परभणी जिल्ह्यातील (ता. पाथरी) बाभळगाव पेठ येथील दिव्या आव्हाड या चार महिन्याच्या बालिकेचा उष्मघाताने मृत्यू झाला. बंडु आव्हाड हे तिला पत्नीसह शेतामध्ये घेऊन गेले होते़ रात्री ताप आल्याने तिची शुद्ध हरपली. खाजगी हॉस्पीटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान :पुणे ४०़८, अहमदनगर ४४़३, जळगाव ४४़२, कोल्हापूर ४०़, महाबळेश्वर ३५़३, मालेगाव ४४़६, नाशिक ४०़१, सांगली ४१़४, सातारा ४१़६, सोलापूर ४३़८, मुंबई ३३, अलिबाग ३३़६, रत्नागिरी ३२़५, पणजी ३३़७, डहाणु ३३़९, उस्मानाबाद ४३़१, औरंगाबाद ४१़४, परभणी ४४़२, नांदेड ४४़४, अकोला ४४़९, अमरावती ४३़६, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४५़८, चंद्रपूर ४६़४, गोंदिया ४४, नागपूर ४५़५, वाशिम ४३, वर्धा ४५, यवतमाळ ४४़ (अंश सेल्सिअस)