शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

उष्णतेने महाराष्ट्र पुन्हा होरपळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:59 IST

उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र पुन्हा एकदा होरपळून निघाला आहे. विदर्भाला सर्वाधिक झळ बसली असून मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र भाजून निघाला आहे.

पुणे/नागपूर/अकोला : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र पुन्हा एकदा होरपळून निघाला आहे. विदर्भाला सर्वाधिक झळ बसली असून मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र भाजून निघाला आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला येथे ४६़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. रात्रीच्या किमान तापमानातही राज्यात सर्वत्र वाढ झाली आहे.

पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी तसेच ओडिशा, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात येथे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ त्यात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यताअसून उष्णतेची ही लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४१़६ (२५़१), अहमदनगर ४३़४ (२३़६), जळगाव ४३ (२७़६), कोल्हापूर ४०़७ (२६़१), महाबळेश्वर ३३़४ (२२़४), मालेगाव ४२़६ (२६़८), नाशिक ४०़५ (२३़६), सांगली ४१़२(२३़९), सातारा ४०़४(२६), सोलापूर ४२़८ (२७़२), मुंबई ३२़५ (२६़८), अलिबाग ३१़८(२५़५), रत्नागिरी ३३़६ (२५़८), पणजी ३४़४ (२५़६), उस्मानाबाद ४२़१, औरंगाबाद ४२़५ (२४़७), परभणी ४५ (२२़५), अमरावती ४०़५(२३़२), बुलढाणा ४२़५ (२७़२), चंद्रपूर ४५़४ (२९), गोंदिया ३९़८ (२४़२), नागपूर ४४़३ (२७़४), वाशिम ४३़८ (२८), वर्धा ), यवतमाळ ४४़५ (२९़४)

विदर्भात ऑरेंज अलर्ट जारीविदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले असून हवमान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेव्हा तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा कडक उन आरोग्याला घातक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभाग ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करीत असतो. 

अकोल्याचे तापमान जगात तिसऱ्या क्रमांकावरअकोल्याचे गुरुवारचे ४६.३ अंश सेल्सिअस तापमान जगात तिसºया क्रमांकावर होते. मध्यप्रदेशातील खरगोन येथे ४६.५, म्यानमारमधील चौक येथे ४६.४ त्यानंतर तिसºया क्रमाकांवर अकोल्याचे तापमान नोंदविले गेले.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़ या चक्रीवादळामुळे तमिळनाडू किनारपट्टीचा भाग, केरळ, आंध्रच्या द. किनाºयावर २८एप्रिल ते १ मे दरम्यान अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र