शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेने महाराष्ट्र पुन्हा होरपळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:59 IST

उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र पुन्हा एकदा होरपळून निघाला आहे. विदर्भाला सर्वाधिक झळ बसली असून मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र भाजून निघाला आहे.

पुणे/नागपूर/अकोला : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र पुन्हा एकदा होरपळून निघाला आहे. विदर्भाला सर्वाधिक झळ बसली असून मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र भाजून निघाला आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला येथे ४६़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. रात्रीच्या किमान तापमानातही राज्यात सर्वत्र वाढ झाली आहे.

पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी तसेच ओडिशा, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात येथे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ त्यात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यताअसून उष्णतेची ही लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४१़६ (२५़१), अहमदनगर ४३़४ (२३़६), जळगाव ४३ (२७़६), कोल्हापूर ४०़७ (२६़१), महाबळेश्वर ३३़४ (२२़४), मालेगाव ४२़६ (२६़८), नाशिक ४०़५ (२३़६), सांगली ४१़२(२३़९), सातारा ४०़४(२६), सोलापूर ४२़८ (२७़२), मुंबई ३२़५ (२६़८), अलिबाग ३१़८(२५़५), रत्नागिरी ३३़६ (२५़८), पणजी ३४़४ (२५़६), उस्मानाबाद ४२़१, औरंगाबाद ४२़५ (२४़७), परभणी ४५ (२२़५), अमरावती ४०़५(२३़२), बुलढाणा ४२़५ (२७़२), चंद्रपूर ४५़४ (२९), गोंदिया ३९़८ (२४़२), नागपूर ४४़३ (२७़४), वाशिम ४३़८ (२८), वर्धा ), यवतमाळ ४४़५ (२९़४)

विदर्भात ऑरेंज अलर्ट जारीविदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले असून हवमान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेव्हा तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा कडक उन आरोग्याला घातक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभाग ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करीत असतो. 

अकोल्याचे तापमान जगात तिसऱ्या क्रमांकावरअकोल्याचे गुरुवारचे ४६.३ अंश सेल्सिअस तापमान जगात तिसºया क्रमांकावर होते. मध्यप्रदेशातील खरगोन येथे ४६.५, म्यानमारमधील चौक येथे ४६.४ त्यानंतर तिसºया क्रमाकांवर अकोल्याचे तापमान नोंदविले गेले.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़ या चक्रीवादळामुळे तमिळनाडू किनारपट्टीचा भाग, केरळ, आंध्रच्या द. किनाºयावर २८एप्रिल ते १ मे दरम्यान अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र