शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल से’ एक्स्प्रेसला समर्थकांच्या शंकेचा ‘ब्रेक’

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

शेट्टी-सदाभाऊंमध्ये बेबनावची चर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समीकरण बदलतंय

अशोक पाटील --इस्लामपूर--राज्यातील ऊस, कांदा आणि कापूस उत्पादकांच्या ताकदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत लाल दिव्याच्या गाडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीपुढे वटकण लावून बसले आहेत. त्याचा फैसला अद्याप झाला नसला तरी, शेट्टी व खोत यांच्याजवळील कार्यकर्त्यांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोटातच उधाण आले आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी एफआरपी एकरकमी मिळण्यासाठी साखरसम्राटांचा केंद्रबिंदू असलेल्या वाळवा, शिराळ्यात संघर्षाची भाषा सुरू केली आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या पाठीशी जुन्या व ठराविक कार्यकर्त्यांचाच वावर असल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने राम पाटील, अनिल पाटील (शिराळा), आप्पा पाटील (इस्लामपूर), शहाजी पाटील (ताकारी), शहाजी पाटील, गणेश शेवाळे (बहे), मधुकर डिसले (किल्ले मच्छिंद्रगड), गुंडाभाऊ आवटी (तांबवे), अशोक सलगर (खरातवाडी), अ‍ॅड. युनूस संदे (पेठ) आदीसारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच सदाभाऊ यांना राज्यात लाल दिव्याची गाडी मिळणार, या स्वार्थापोटी काही नवीन कार्यकर्ते खोत यांच्याभोवती वावरताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. सध्या सदाभाऊ खोत यांच्याभोवती काही ठराविक कार्यकर्त्यांचाच लवाजमा दिसत आहे. सचिन पवार (रेठरे हरणाक्ष), भास्कर कदम (मसुचीवाडी), भागवत जाधव (नवेखेड) यांचा समावेश असून, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मात्र दोन्ही नेत्यांना समान अंतरावर ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांत शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे पानिपत करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यासाठी निश्चय केला होता. परंतु हा हेतू सफल न होता, संघटनेतीलच बी. जे. पाटील यांनी स्वाभिमानी पक्ष सोडून मोठा हादरा दिला. तसेच कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील हेही या संघटनेत सामील झाले होते. परंतु त्यांनी अपक्ष अर्ज भरून एकास एक उमेदवारीचा फज्जा उडविला. त्यामुळे जयंत पाटील एकाकी निवडून आले. तेव्हापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात या सर्वच कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी सावरले नाही, तर स्वाभिमानी संघटनेला उतरती कळा लागेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वाभिमानी संघटना सध्या सरकारबरोबर आहे. राजू शेट्टी आणि खोत यांनी शासनदरबारी बसून ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारवर दबाव आणला पाहिजे. जयंत पाटील यांना ऊस उत्पादकांबद्दल प्रेम नाही, तर त्यांच्या कारखान्याच्या को-जनरेशनचे काम पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एफआरपी एकरकमी देण्यासाठी दोन महिने साखर कारखाने बंद ठेवण्याची भाषा केली आहे. हा फक्त बनाव आहे. - अभिजित पाटील, माजी जि. प. सदस्य