शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला?; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 8:27 PM

Coronavirus राज्यातील कोरोनाबाधितांच्या गेल्या काही सातत्यानं लक्षणीय वाढ

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०० च्या वर गेला आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीनशेपेक्षा अधिक आहे. त्यातच निझामुद्दीनमधील तबलिगी जमातीचे कित्येक जण राज्यात परतल्यानं चिंतेत भर पडली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं जनता काळजीत आहे. या परिस्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी भाष्य केलं.राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वेगानं वाढत आहे. त्यावर भाष्य करताना टोपेंनी वाढत्या वैद्यकीय तपासण्यांचा संदर्भ दिला. गेल्या काही दिवसांत आपण मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करत आहोत. शासकीय रुग्णालयांसोबतच काही खासगी लॅब्सनादेखील तपासण्या करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तपासण्यांचं प्रमाण वाढल्यानं रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. यामुळे सद्यस्थिती समोर येत आहे. त्यामुळे ही बाब चांगलीच आहे. कोरोनाबाधित लवकर आढळून आल्यास त्याच्यावर उपचार सुरू होऊ शकतात, असं टोपे म्हणाले.राज्यात कोरोनाचा तिसरा टप्पा सुरू झालेला नाही. आपण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात असल्याची माहिती टोपेंनी दिली. तिसऱ्या टप्प्यात समूह संसर्ग सुरू होतो. मात्र अद्याप तरी राज्यात तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. परदेशातून आलेल्या काहींना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर काही जण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाली आहे. आपण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात आहोत. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीच्या निझामुद्दीनमधल्या मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या सगळ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. याबद्दलची माहिती पोलीस महासंचालकांकडे पोहोचली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाईल आणि उपचारांची गरज असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल, असं टोपेंनी सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस