शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

"आता तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?; दोन समाजात आगी लावून...!" संजय राऊतांचा फडणीसांवर थेट हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:04 IST

"दोन समाजात आगी लाऊन, ते बघण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत, असे फडणवीस काल म्हणाले. विरोधी पक्षाला काय पडलेय आग लावायचे काम करून? सरकार कुणाचे आहे गेल्या काही काळापासून? आम्ही कशाला आगी लावू? दोन समाजात आगी लावून निवडणुकीत उतरण्याचे धंदे आपले आहे," असेही राऊत म्हणाले.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह थेट मुंबईत पोहचले आहेत. येथील आझाद मैदानावर कालपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर राज्यातील राजकारणही तापलेले दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण म्हणत होतात, या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसांत आरक्षण मिळू शकते. आता तुम्ही सत्तेवर आहात, आत तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?" असा सवाल राऊतांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, या आंदोलनाच्या चुलीवर कुणी पोळी भाजू नये. कोण भाजतंय? आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनांवर पोळ्या भाजण्याचे काम आपण केले आहे फडणवीस जी." याच वेळी "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपले वक्तव्य  काय होते? जरा आठवा... आरक्षणासंदर्भात... आपण म्हणत होतात, या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसांत आरक्षण मिळू शकते. आता तुम्ही सत्तेवर आहात, तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे."

राऊत पुढे म्हणाले, "आपण राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात, असे मी मानतो. मग त्या राजकीय इच्छाशक्तीचे काय झाले? मराठा समाजाला आणि धनगर समाजाला सरकार आल्या बरोबर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आठ दिवसांत आरक्षण देण्यासंदर्भात जी इच्छा शक्ती फडणवीस यांच्याकडे होती, ती कुठे गायब झाली. यासाठी त्यांनी एखाद्या एसआयटीची घोषणा करायला हरकत नाही."  

"दोन समाजात आगी लाऊन, ते बघण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत, असे फडणवीस काल म्हणाले. विरोधी पक्षाला काय पडलेय आग लावायचे काम करून? सरकार कुणाचे आहे गेल्या काही काळापासून? आम्ही कशाला आगी लावू? दोन समाजात आगी लावून निवडणुकीत उतरण्याचे धंदे आपले आहे," असेही राऊत म्हणाले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना