शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:21 IST

Uddhav Thackeray On ECI: इंडिया आघाडीच्या मोर्चावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केल्यानंतर, इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. परंतु, पोलिसांनी संसदेच्या आवारातच या मोर्चाला अडवले आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. यावर ठाकरे गटचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली असून "निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले का?" असा  कडवट सवाल त्यांनी केला.

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात दिवसाढवळ्या मतांची चोरी होत आहे आणि ती लपवण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे. निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? दिल्लीतील केंद्र सरकारने जो तमाशा केला आहे, तो लांच्छनास्पद आहे. ज्या खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले, त्यांना अटक करण्यात आली. सरकारने स्वतःच लोकशाहीला काळिमा फासला आहे", अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला

राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर, इंडिया आघाडीने आज एक मोठा मोर्चा काढला. त्यानुसार, ३०० खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केली. परंतु, पोलिसांनी संसदेच्या आवारातच हा मोर्चा रोखला, ज्यामुळे खासदार आक्रमक झाले. यानंतर, पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेसच्या महिला खासदारही चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. अनेक महिला खासदारांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून निषेध व्यक्त केला.  समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादवदेखील बॅरिकेट्सवर चढून बाहेर पडले, परंतु त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतPriyanka Gandhiप्रियंका गांधीSupriya Suleसुप्रिया सुळे