शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:37 AM

सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार  मैदानात उतरविणार असल्याचा निर्णय शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे प्रमुख व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकतेच जाहीर केला होता. पुन्हा युतीचे सरकार येऊ शकते. त्यामुळे आपण राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे टाळले असून, विरोधीपक्षातील आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही. तर मनसेत असताना मी हे स्व:ता अनुभवलं असल्याचा दावा जाधव यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात केला.

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जाधव यांनी २ लाख ८३ हजार मते घेतली. त्यांची ही मते ‘किंगमेकर’ठरली होती. तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपण उतरणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र जाधव हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती.  शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे पर्याय समोर असताना सुद्धा कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्या संपर्कातून निर्णय घेतला असल्याचे  जाधव म्हणाले होते.

तसेच कोणत्याही पक्षासोबत न जाता, अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णय का घेतला याचा खुलासा जाधव यांनी गुरुवारी कन्नड येथे घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमुळे भाजप-शिवसेनेच्या बाजूची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरीही भविष्यात युतीत बिघाडी निर्माण होणार असून, अशावेळी दोन्ही पक्षाचे नेते काही अपक्ष आमदार हाताशी लागतात का? याचा शोध घेतील. त्यामुळे अशा वेळी अपक्ष आमदार त्यांच्या बरोबर गेला तर मंत्रिमंडळात त्याची शंभर टक्के वर्णी लागणार.

तर विरोधीपक्षात असताना कुठलेही मदत नाही,कुठलेही बजेट नाही,निधी मिळत नाही. एवढचं नाही तर पोलिसांचा मारहाण करेपर्यंत त्रास मी सहन केला आहे. सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे. विरोधीपक्षात असलेल्या आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही ही परिस्थिती असून, मी स्व:ता मनसेत असताना हे अनुभवलं असल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विकास कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांशी माझे संबध चांगले असायला पाहिजे, यासाठी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.