शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा"; मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:35 IST

बंजारा समाजाच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मलाच आता वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देवनमंत्रीपदासाठी मोठी चढाओढ सुरूवनमंत्रिपदासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉबिंगवनमंत्रीपद द्या, या मागणीसाठी थेट उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता वनमंत्रीपदासाठी लॉबिंग केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच बंजारा समाजाच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मलाच आता वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे. (haribhau rathod wrote letter to cm uddhav thackeray for demanding forest ministry)

बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वनमंत्री करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा, असे हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटले आहे. 

MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा

काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद

आता वनमंत्रीपद मला द्यावे. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते, असेही राठोड यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकास आघाडीत वनमंत्रिपद मिळवण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, त्याच मंत्र्याकडे जाईल, असे सांगितले जात आहे. 

वनमंत्रीपदासाठी मोठी चढाओढ

राजकीय वर्तुळातील चर्चा आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनमंत्रीपदासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचे समजते. तर, मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का, याची चाचपणी करत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात असल्याने उद्धव ठाकरे यांना अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेर मंजूर करावा लागला होता. मंत्रिपद टिकावे, यासाठी संजय राठोड यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करत दबावतंत्राचा वापरही केला होता, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागPooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस