शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या अन्यथा आंदोलन – रविकांत तुपकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:47 IST

दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा...

मुंबई - दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला.    जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, 10 व 11 फेब्रुवारी रोजी विदर्भ-मराठवाड्यात राज्यात अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहु, हरभरा, तुर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठ्या फटका बसला. शेतकऱ्यांची ही पीके अक्षरश: जमीनदोस्त झाली. आधिच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.   बुलडाणा जिल्ह्यातील 356 गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यु झाला. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारने कपाशीवर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही हे अनुदान शेकतऱ्यांना मिळाले नाही. सरकारच्या या घोषणेवर आता आमचा विश्वास नाही. राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे.   छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. छत्रपती शिवरांच्या काळात शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केल्या नाहीत. मात्र छत्रपतींचे नांव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरु केली आहे. राज्यात अचानक झालेल्या या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र