शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

 गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या अन्यथा आंदोलन – रविकांत तुपकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:47 IST

दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा...

मुंबई - दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला.    जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, 10 व 11 फेब्रुवारी रोजी विदर्भ-मराठवाड्यात राज्यात अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहु, हरभरा, तुर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठ्या फटका बसला. शेतकऱ्यांची ही पीके अक्षरश: जमीनदोस्त झाली. आधिच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.   बुलडाणा जिल्ह्यातील 356 गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यु झाला. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारने कपाशीवर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही हे अनुदान शेकतऱ्यांना मिळाले नाही. सरकारच्या या घोषणेवर आता आमचा विश्वास नाही. राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे.   छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. छत्रपती शिवरांच्या काळात शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केल्या नाहीत. मात्र छत्रपतींचे नांव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरु केली आहे. राज्यात अचानक झालेल्या या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र