शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

राज्यात अटकळबाजीला ऊत!

By admin | Updated: October 17, 2014 11:00 IST

विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल यंत्रबद्ध होताच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरून आता राजकीय अटकळबाजीला ऊत आला आहे.

सगळेच दावेदार : राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही - खडसे : राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची - पटेल
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल यंत्रबद्ध होताच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरून आता राजकीय अटकळबाजीला ऊत आला आहे. एक्ङिाट पोलने वर्तविलेल्या भाकिताहून अधिक यश आम्हाला मिळणार आहे, त्यामुळे आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते करीत आहेत. तर याउलट, निकालानंतर सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केल्यामुळे चर्चेचे पेव फुटले आहे.
13व्या विधानसभेसाठी राज्यात बुधवारी (15 ऑक्टोबर) मतदान झाले. मतदान यंत्रत शेवटचे मत नोंदण्याअगोदरच विविध वाहिन्यांनी दाखविलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला. एक्ङिाट पोलचे निकाल येताच भाजपामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संभाव्य मंत्रिमंडळात कोण-कोण असेल, कोणाला कोणते खाते मिळेल, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. काहीनी तर मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तर याउलट परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत आहे. काँग्रेसचे नेते एक्ङिाट पोलवर बोलण्यास तयार नाहीत, तर हे अंदाज साफ चुकून आम्हाला किमान 6क् ते 7क् जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. भाजपाला 9क् ते 1क्क्च्या आसपास जागा मिळाल्या तर शिवसेनेची मदत घ्यावी लागेल. कारण दुस:या क्रमांकावरील जागा शिवसेनेला मिळतील, असा अंदाज आहे. जर भाजपाला 11क् ते 125 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल किंवा पाडली जाईल आणि एक गट भाजपाकडे येऊन पाठिंबा देईल, असा तर्क लढविला जात आहे. भाजपाला 13क् ते 14क् जागा मिळाल्या तर मनसे व अपक्ष यांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याकडे कल राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
 
च्ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या उमेदवारांसोबत सरकारबद्दलची नाराजी (अँटीइन्कम्बन्सी) त्यांना चिकटून राहिली. त्यामुळे असे किमान 7 ते 8 उमेदवार निवडून येणार नाहीत, अशी कबुली भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
च्खडसे म्हणाले की, दोन्ही काँग्रेसमधील काही लोकांना भाजपाने संधी दिली. मात्र त्यांना निवडणूक सोपी नाही हे प्रचारात जाणवले. काँग्रेसच्या सरकारमधील या लोकांनी पक्ष बदलला तरी अँटीइन्कम्बन्सी चिकटून राहिली. महागाई, लोडशेडिंग, भ्रष्टाचार याला हीच मंडळी जबाबदार असल्याचे त्यांच्या मतदारसंघातील लोक सांगत होते. त्याचा फटका अन्य पक्षातून आलेल्या काही उमेदवारांना बसणार आहे. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात चूक झालेली नाही. मतदारसंघात उमेदवार न देण्यापेक्षा उमेदवार देणो गरजेचे होते.
 
युती हे काय सात जन्माचे नाते होते का?
शिवसेना-भाजपा युती तुटल्याचा काहींना आनंद झाला तर काहींना दु:ख झाले. युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी अभिनंदनाचे दूरध्वनी केले, असे सांगून खडसे म्हणाले, युती तुटली म्हणजे काय, सात जन्माचे नाते होते का ते? आम्ही सात फेरे घेतले होते का? शिवसेना-भाजपामध्ये मोठा व लहान भाऊ कोण, हा प्रश्न 25 वर्षे सुटत नव्हता. 
 
राष्ट्रवादी किंगमेकर ठरेल
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले जात असले, तरी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील.- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते
 
शिवसेना नकोच!
शिवसेनेबद्दल तीव्र नाराजी आहे. विशेषत: स्वत: उद्धव ठाकरे व ‘सामना’तून झालेल्या टीकेबद्दल कार्यकत्र्यामध्ये संताप आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊ नका, असे कार्यकत्र्याचे म्हणणो असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
 
भाजपामध्ये युतीवरून दोन प्रवाह
सरकार स्थापन करण्याकरिता काही आमदार कमी पडले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.