शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

राज्यात अटकळबाजीला ऊत!

By admin | Updated: October 17, 2014 11:00 IST

विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल यंत्रबद्ध होताच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरून आता राजकीय अटकळबाजीला ऊत आला आहे.

सगळेच दावेदार : राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही - खडसे : राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची - पटेल
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल यंत्रबद्ध होताच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरून आता राजकीय अटकळबाजीला ऊत आला आहे. एक्ङिाट पोलने वर्तविलेल्या भाकिताहून अधिक यश आम्हाला मिळणार आहे, त्यामुळे आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते करीत आहेत. तर याउलट, निकालानंतर सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केल्यामुळे चर्चेचे पेव फुटले आहे.
13व्या विधानसभेसाठी राज्यात बुधवारी (15 ऑक्टोबर) मतदान झाले. मतदान यंत्रत शेवटचे मत नोंदण्याअगोदरच विविध वाहिन्यांनी दाखविलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला. एक्ङिाट पोलचे निकाल येताच भाजपामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संभाव्य मंत्रिमंडळात कोण-कोण असेल, कोणाला कोणते खाते मिळेल, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. काहीनी तर मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तर याउलट परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत आहे. काँग्रेसचे नेते एक्ङिाट पोलवर बोलण्यास तयार नाहीत, तर हे अंदाज साफ चुकून आम्हाला किमान 6क् ते 7क् जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. भाजपाला 9क् ते 1क्क्च्या आसपास जागा मिळाल्या तर शिवसेनेची मदत घ्यावी लागेल. कारण दुस:या क्रमांकावरील जागा शिवसेनेला मिळतील, असा अंदाज आहे. जर भाजपाला 11क् ते 125 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल किंवा पाडली जाईल आणि एक गट भाजपाकडे येऊन पाठिंबा देईल, असा तर्क लढविला जात आहे. भाजपाला 13क् ते 14क् जागा मिळाल्या तर मनसे व अपक्ष यांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याकडे कल राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
 
च्ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या उमेदवारांसोबत सरकारबद्दलची नाराजी (अँटीइन्कम्बन्सी) त्यांना चिकटून राहिली. त्यामुळे असे किमान 7 ते 8 उमेदवार निवडून येणार नाहीत, अशी कबुली भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
च्खडसे म्हणाले की, दोन्ही काँग्रेसमधील काही लोकांना भाजपाने संधी दिली. मात्र त्यांना निवडणूक सोपी नाही हे प्रचारात जाणवले. काँग्रेसच्या सरकारमधील या लोकांनी पक्ष बदलला तरी अँटीइन्कम्बन्सी चिकटून राहिली. महागाई, लोडशेडिंग, भ्रष्टाचार याला हीच मंडळी जबाबदार असल्याचे त्यांच्या मतदारसंघातील लोक सांगत होते. त्याचा फटका अन्य पक्षातून आलेल्या काही उमेदवारांना बसणार आहे. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात चूक झालेली नाही. मतदारसंघात उमेदवार न देण्यापेक्षा उमेदवार देणो गरजेचे होते.
 
युती हे काय सात जन्माचे नाते होते का?
शिवसेना-भाजपा युती तुटल्याचा काहींना आनंद झाला तर काहींना दु:ख झाले. युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी अभिनंदनाचे दूरध्वनी केले, असे सांगून खडसे म्हणाले, युती तुटली म्हणजे काय, सात जन्माचे नाते होते का ते? आम्ही सात फेरे घेतले होते का? शिवसेना-भाजपामध्ये मोठा व लहान भाऊ कोण, हा प्रश्न 25 वर्षे सुटत नव्हता. 
 
राष्ट्रवादी किंगमेकर ठरेल
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले जात असले, तरी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील.- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते
 
शिवसेना नकोच!
शिवसेनेबद्दल तीव्र नाराजी आहे. विशेषत: स्वत: उद्धव ठाकरे व ‘सामना’तून झालेल्या टीकेबद्दल कार्यकत्र्यामध्ये संताप आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊ नका, असे कार्यकत्र्याचे म्हणणो असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
 
भाजपामध्ये युतीवरून दोन प्रवाह
सरकार स्थापन करण्याकरिता काही आमदार कमी पडले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.