शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:50 IST

राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने कांद्याचे बाजार चांगलेच पडले.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील १२ हजार २२५ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम नाशिक ७१ हजार, अहमदनगर ४८ हजार शेतकऱ्यांना फायदा

पुणे : कांद्याचे बाजार पडलेल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ७१ हजार ४३८ तर अहमदनगर जिल्ह्यातील ४८ हजार ९११ आणि पुणे जिल्ह्यातील १२ हजार २२५ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने कांद्याचे बाजार चांगलेच पडले. त्यामुळे राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांद्याचे बाजार पडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. प्रथमत: ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास विलंब झाल्याने ही मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यातील ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यांच्याही बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. राज्यातील सात विभागातील १८ जिल्ह्यामधील ७७  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी छाननी केली. त्यानंतर तालुका स्तरावरील समिती १ लाख ६० हजार ६९८ शेतकरी पात्र ठरविले आहेत. या शेतकऱ्यांनी ५७ लाख ४० हजार ११७ कांद्याची विक्री केली असून त्यांना ११४ कोटी ८० लाख २३ हजार ४३६ रुपये अनुदान देण्यात आले आहे.जिल्हानिहाय कांदा अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी :- नाशिक- ७१,४३८,  धुळे-३६३६, जळगाव-१,२२३,अहमदनगर-४८,९११ , पुणे-१२,२२५, सोलापूर-८,८८३ ,कोल्हापूर-४,०५३ , सांगली-७२२ ,सातारा-१,३१७,औरंगाबाद-२,८७६, जालना-१२ , अमरावती-२३, अकोला-२६३,बुलढाणा-३६१, लातूर-३१६, उस्मानाबाद-६०८, बीड-३,७६१, नागपूर-०.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीGovernmentसरकार