शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

ग्रामपंचायत विकासाची केंद्रबिंदू व्हावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 5:23 AM

ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डला दरवर्षी किमान ५ लाख रुपये विकासनिधी मिळण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांना विशेष अधिकार व दर्जा बहाल करण्यासाठी सात अभ्यासपूर्ण मागण्या घेऊन किसान, वॉटर, लँड व ग्राम आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिले राष्ट्रीय आंदोलन सुरू झाले आहे. त्यानिमित्त त्यांची ही भूमिका.

- प्रफुल्ल कदमग्रामपंचायत वॉर्ड व ग्रामपंचायत सदस्य हा लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा आणि पायाभूत घटक आहे. मात्र, सत्तेचे विकेंद्रीकरण करताना स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत त्याचा कोणीही गांभीर्याने विचार केला नाही. स्वातंत्र्यापूर्व काळात ब्रिटिशांनी केलेल्या १९०६, १९१५, १९३५च्या कायद्यापासून ते स्वातंत्र्यानंतर ७३व्या घटनादुरुस्तीपर्यंत पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध पातळीवर बरेच प्रयत्न झाले, परंतु गांधीजींच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलेलो नाही. शहराचा विकास होताना खेडी मात्र उपेक्षितच राहिली. त्यातूनच ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी शहरात स्थलांतर झाले. त्यामुळे मतदानाच्या दृष्टीने खेड्यांचे महत्त्व आणखी कमी झाले. मुंबई-दिल्लीतील काही मंडळी विकासाचे तेच गणित मांडत बसली आहेत. दुसरीकडे खेड्यातील माणूस अजूनही दगड-मातीचाच हिशेब करीत बसला आहे. त्याच्या हातात मोबाइल, अंगावर रंगीबेरंगी कपडे असले, तरी शिक्षण, आरोग्यासारख्या पायाभूत सुविधांपासून दूरच आहे. भाकरीच्या प्रश्नात तो अडकला आहे. ग्रामपंचायत पातळीवरील प्रश्नांना समजून घेण्यासाठी. त्याची सोडवणूक करण्यासाठी दुर्दैवाने कोणालाही वेळ नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोणाच्या तरी मेहरबानीची वाट पाहावी लागते. स्पष्टपणे सांगायचे, तर राज्य घटनेतील अनुसूची ११ मधील ग्रामपंचायतीची कामे आणि जबाबदाऱ्या चेष्टेचा विषय झाला आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी मी अत्यंत वेगळ्या, अभ्यासपूर्ण, कायदेशीर, व्यावहारिक आणि क्रांतिकारक अशा ७ मागण्या घेऊन ग्रामीण विकासाचे चित्र बदलण्यासाठी उभा राहिलो आहे.-ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डमध्ये स्थानिकांची मागणी व गरजेनुसार विकासकामे करण्यासाठी दरवर्षी किमान ५ लाख रुपये द्यावेत.उपरोक्त निधी खर्च करण्याचे अधिकार ग्रामपंचायत सदस्यालाच देण्यात यावेत.-नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार किंवा खासदार निवडण्याचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार द्यावा.-शिक्षक व पदवीधर मतदार संघाप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांचा स्वतंत्र मतदार संघ तयार करून विभागवार किमान ५ स्वतंत्र आमदार विधान परिषदेवर घ्यावेत.-जिल्हा नियोजन मंडळावर ग्रामपंचायत सदस्यांना पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे.-ग्रामपंचायत सदस्यांची किमान तीन महिन्यांत तालुका अथवा गट स्तरावर आढावा बैठक घ्यावी.-ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार व ग्रामीण विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी वॉर्ड पातळीवर विकासाला चालना देण्यासाठी नियोजन व आराखडा बनविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर समिती नेमावी. ग्रामीण भागाच्या विकासाठी एक मिशन म्हणून त्यात काम करण्याची माझी तयारी आहे.-उपरोक्त ७ मागण्यांसाठी मी राष्ट्रीय आंदोलनाची सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार व ग्रामीण विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे, निधी उपलब्ध होणे हा राष्ट्रीय आंदोलनाचा मुख्य विषय आहे. ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार व दर्जा बहाल केला, तर राज्यातील २८,८१३ व देशातील २,४८,६१३ ग्रामपंचायतींमध्ये हजारो सदस्यांच्या योगदातून विकास साध्य होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे व्यापक लोकसहभागाची.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMaharashtraमहाराष्ट्र