शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:45 IST

Nana Patole: राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई - लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लम्पी आजारामुळे राज्यातील पशुमालक चिंतेत आहेत. सरकार लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगत आहे तरीही रोगाची लागण कमी होताना दिसत नाही. मागील पंधरा दिवसात ७ हजार पशुंचा लम्पी रोगामुळे मृत्यू झाला असून लागण झालेल्या पशुंचा आकडाही अजून लाखात असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत लम्पी रोगामुळे राज्यातील तब्बल २४ हजार पशुधनांचा मृत्यू झाला आहे. १०० टक्के लसीकरण झाले असेल तर ह्या लसी लम्पी रोगाची लागण रोखण्यात प्रभावी नाहीत का? लम्पी रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुमालकांना राज्य सरकार आर्थिक मदत देत आहे पण यातून प्रश्न सुटत नाही. लम्पी रोग नियंत्रणावर मिळवण्यात राज्य सरकारचे फारसे लक्ष नाही, असे यातून दिसते.

लम्पी रोगामुळे केवळ गोवंशीय पशुधन त्यातच देशी गाईंचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. लम्पी रोगामुळे दुग्धव्यवसायावरही परिणाम होत असून दुग्ध संकलन घटल्याचे दिसत आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, वेळीच लसीरकरण केले तर लम्पीपासून जनावरांना धोका संभवत नाही असे सरकार म्हणत आहे. राज्यात मोफत लसीकरण झाल्याचा सरकारचा दावा आहे असे असतानाही रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात सरकारी उपाययोजना कमी पडत आहेत. पशुधन हे लाखामोलाच असून ते टिकवले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार