शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 07:55 IST

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवातं पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही, अशा शब्दात सामनातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मुंबई, दि. बुधवारी मुंबईतील भेंडीबाजार परिसरात हुसैनी ही सहा मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकुण 34 जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये धोकादायक इमारत कोसळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्येही अशीच दुर्घटना घडली होती. इमारत पडणाच्या या घटनांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. या घटनांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मुंबईत घडणाऱ्या या घटनांमुळे मुंबई महापालिकेवरही टीका होते आहे. यावर सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे.  मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबं राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खातं नेमकं करतं काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही, अशा शब्दात सामनातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे, 

मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कच-याने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे.

डॉ. दीपक अमरापूरकर हे मुंबईतील मुसळधार पावसात बेपत्ता झाले व तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वरळी समुद्राजवळ सापडला. उघड्या गटारामध्ये ते पडले व तिथून ते वाहत गेले. देश एका नामांकित पोटविकारतज्ञास मुकल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही स्वतः डॉ. अमरापूरकर यांना ओळखत होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात ते ‘मातोश्री’वर येत होते व शिवसेनाप्रमुखांवर उपचार करीत होते. त्यामुळे त्यांचे हे असे जाणे नुसते चटका लावणारे नाही, तर धक्कादायक आहे. निसर्गाचे रौद्ररूप असे भयंकर असते की, त्याने किती जणांचा बळी घेतला आहे याचे हिशेब नंतर समजतात. मुंबई-ठाण्यात अनेक निरपराध्यांना २९ ऑगस्टच्या निसर्ग तांडवाचा फटका बसला असून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. भेंडीबाजार परिसरात ११७ वर्षांची जुनी इमारत कोसळून त्यात ३३ जणांना प्राण गमवावे लागले, अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या इमारतीचा क्षणात मातीचा ढिगारा झाला व अनेक हसती खेळती कुटुंबे त्या ढिगाऱयाखाली कायमची दबली गेली. 

मुसळधार पावसात जुन्या–मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याच्या दुर्घटना होतात व लोक प्राणास मुकतात. म्हाडाने धोकादायक ठरवूनही या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत व असे अपघात झाल्यावर धावाधाव होते, एकमेकांवर खापर फोडले जाते. मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खाते नेमके करते काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱया बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही. बडय़ा बिल्डरांचे ‘टॉवर्स’ ज्या वेगाने उभे राहतात व बिल्डरांच्या फायलींना सरकारदरबारी जी गती मिळते तो वेग गरीबांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या नशिबी नसतो. पुनर्विकासाचे विषय हे अस्पृश्यच ठरतात व एस.आर.ए. प्रकल्पांची पाने पुढे सरकत नाहीत. तिथे सर्वच पातळीवर भ्रष्टाचार आहे. मुंबईत ज्या इमारतींची तातडीने पुनर्बांधणी आवश्यक आहे अशा आजच्या घडीला १४ हजार इमारती उद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत आहे व अशा इमारती कोसळून त्यात माणसे मरत आहेत. मग ही माणसे म्हाडाच्या हलगर्जीपणामुळे मेली की महापालिकेच्या बेफिकिरीमुळे मृत झाली असे एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रकार दुसरी इमारत कोसळेपर्यंत सुरूच राहतात. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करायला हव्यात, पण त्या इमारतींमधील रहिवाशांनी राहायला जायचे कुठे, याचे उत्तर आज कुणाकडे नाही. ‘ट्रान्झिट कॅम्प’ म्हणून जो काही प्रकार आहे त्यापेक्षा ‘नरक’ किंवा छळछावण्या बऱया. त्यामुळे लोक मोडकळीस आलेल्या इमारतीत राहून मरण पत्करतात, पण त्या ‘ट्रान्झिट कॅम्प’मध्ये जायला धजावत नाहीत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना