शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 07:55 IST

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवातं पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही, अशा शब्दात सामनातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मुंबई, दि. बुधवारी मुंबईतील भेंडीबाजार परिसरात हुसैनी ही सहा मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकुण 34 जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये धोकादायक इमारत कोसळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्येही अशीच दुर्घटना घडली होती. इमारत पडणाच्या या घटनांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. या घटनांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मुंबईत घडणाऱ्या या घटनांमुळे मुंबई महापालिकेवरही टीका होते आहे. यावर सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे.  मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबं राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खातं नेमकं करतं काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही, अशा शब्दात सामनातून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे, 

मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कच-याने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे.

डॉ. दीपक अमरापूरकर हे मुंबईतील मुसळधार पावसात बेपत्ता झाले व तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह वरळी समुद्राजवळ सापडला. उघड्या गटारामध्ये ते पडले व तिथून ते वाहत गेले. देश एका नामांकित पोटविकारतज्ञास मुकल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही स्वतः डॉ. अमरापूरकर यांना ओळखत होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात ते ‘मातोश्री’वर येत होते व शिवसेनाप्रमुखांवर उपचार करीत होते. त्यामुळे त्यांचे हे असे जाणे नुसते चटका लावणारे नाही, तर धक्कादायक आहे. निसर्गाचे रौद्ररूप असे भयंकर असते की, त्याने किती जणांचा बळी घेतला आहे याचे हिशेब नंतर समजतात. मुंबई-ठाण्यात अनेक निरपराध्यांना २९ ऑगस्टच्या निसर्ग तांडवाचा फटका बसला असून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. भेंडीबाजार परिसरात ११७ वर्षांची जुनी इमारत कोसळून त्यात ३३ जणांना प्राण गमवावे लागले, अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या इमारतीचा क्षणात मातीचा ढिगारा झाला व अनेक हसती खेळती कुटुंबे त्या ढिगाऱयाखाली कायमची दबली गेली. 

मुसळधार पावसात जुन्या–मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याच्या दुर्घटना होतात व लोक प्राणास मुकतात. म्हाडाने धोकादायक ठरवूनही या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत व असे अपघात झाल्यावर धावाधाव होते, एकमेकांवर खापर फोडले जाते. मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खाते नेमके करते काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱया बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही. बडय़ा बिल्डरांचे ‘टॉवर्स’ ज्या वेगाने उभे राहतात व बिल्डरांच्या फायलींना सरकारदरबारी जी गती मिळते तो वेग गरीबांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या नशिबी नसतो. पुनर्विकासाचे विषय हे अस्पृश्यच ठरतात व एस.आर.ए. प्रकल्पांची पाने पुढे सरकत नाहीत. तिथे सर्वच पातळीवर भ्रष्टाचार आहे. मुंबईत ज्या इमारतींची तातडीने पुनर्बांधणी आवश्यक आहे अशा आजच्या घडीला १४ हजार इमारती उद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत आहे व अशा इमारती कोसळून त्यात माणसे मरत आहेत. मग ही माणसे म्हाडाच्या हलगर्जीपणामुळे मेली की महापालिकेच्या बेफिकिरीमुळे मृत झाली असे एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रकार दुसरी इमारत कोसळेपर्यंत सुरूच राहतात. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करायला हव्यात, पण त्या इमारतींमधील रहिवाशांनी राहायला जायचे कुठे, याचे उत्तर आज कुणाकडे नाही. ‘ट्रान्झिट कॅम्प’ म्हणून जो काही प्रकार आहे त्यापेक्षा ‘नरक’ किंवा छळछावण्या बऱया. त्यामुळे लोक मोडकळीस आलेल्या इमारतीत राहून मरण पत्करतात, पण त्या ‘ट्रान्झिट कॅम्प’मध्ये जायला धजावत नाहीत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना