शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

सरकार विचारधारेवर नव्हे, किमान समान कार्यक्रमावर चालते; संजय राऊतांचे अजित पवारांबाबत सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:19 IST

खा. संजय राऊत, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणतेही सरकार चालविण्यासाठी विचारधारा (आयडियालॉजी) नव्हे तर किमान समान कार्यक्रम लागतो. महाविकास आघाडी सरकारकडे असा कार्यक्रम आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि त्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. ते सरकारमध्ये असणे ही गरज आहे, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे ‘चाणक्य’ अशी नवी ओळख निर्माण झालेले खा. राऊत सध्या नागपुरात आहेत. येत्या २९ डिसेंबर रोजी ते पुण्यात खा. शरद पवार यांची पुन्हा महामुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी खा. पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लोकमतशी झालेली बातचित अशी-

प्रश्न : महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी नेहरू सेंटरमध्ये जे काही घडले, त्यामुळे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे वाटते?- राजकारणात एखादा प्रसंग असा घडतो की प्रमुख नेता अस्वस्थ होतो व भावनेच्या भरात निर्णय घेऊन टाकतो. अजित पवार यांच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. जे त्यांना ओळखतात, त्यांना या गोष्टीचे कधीच आश्चर्य वाटणार नाही. अजित पवार यांच्या जागी जर मी असतो तर कदाचित मीही तसाच वागलो असतो. म्हणून मला वाटते की जे झाले ते विसरुन आम्ही पुढे गेले पाहिजे. अजित पवार यांच्यासारखा अनुभवी माणूस सरकारमध्ये असणे ही सरकारची गरज आहे.

प्रश्न : काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी यांची विचारधारा एकसमान नाही, मग सरकार कसे चालणार?- पुन्हा तेच सांगतो. सरकार चालविण्यासाठी विचारधारा नव्हे, तर किमान समान कार्यक्रम लागतो. सर्वांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत सुविधा देणे, सामाजिक न्याय, महिलांच्या जगण्याचा स्तर उंचावणे हेच महत्त्वाचे कार्यक्रम असतात. तुम्ही सोमालिया, हैती किंवा रशियात अथवा अमेरिकेत जा. हेच पहायला मिळेल तुम्हाला. आयडियॉलॉजीने पोट भरत नाही.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना आयडियॉलॉजी सांगितली; पण भाषा मात्र शेवटी त्यांनीही पोटाचीची केली ना... आमचे मराठी तरुण उपाशी राहू नयेत, त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून त्यांनी त्यावेळी वडापाव विकायला सांगितलाच ना...

प्रश्न : शरद पवार यांच्या भूमिकेविषयी कधी संशय आला नाही?- मुळात शरद पवारांबाबत अशी शंकाच का यावी? त्यांचा इतिहास पारदर्शक आहे. त्यांनी दगबाजी केलीे असे एक तरी उदाहरण दाखवा. त्यांचे राजकारण नेहमी विकासाच्या मुद्यांवरच राहिले आहे. शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले असे सांगितले जाते. पण त्याआधी आणि नंतर कधी सरकारे पडली नाहीत का? किंबहुना भाजपने महाराष्टÑात आमच्यासोबत जेवढे विश्वासघातकी राजकारण केले तेवढे तर कुणीच केलेले नाही.

प्रश्न : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर वादंग निर्माण झाले. अशी विधाने पुढे होत राहिली तर त्याचा सरकारवर किती परिणाम होईल?- हे सरकार पूर्ण पाच वर्षे काम करेल. राहुल गांधी यांचे विधान त्यांच्यापाशी. आम्ही त्यांना योग्य भाषेत समज दिली आहे आणि तो आमचा अधिकार आहे. आमचे म्हणणे आम्ही मांडले. ज्याला आयडियॉलॉजी म्हणता, ती आयडियॉलॉजी सरकारच्या आड आली नाही. ते बोलले पण आम्ही त्यांचा गैरसमज दूर केला. यापुढे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची जबाबदारी आहे की राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या मनात असे काही विषय असतील तर त्यांचे गैरसमज त्यांनी दूर केले पाहिजेत.

प्रश्न : नगरविकास, गृह आणि महसूल या तीन खात्यांपैकी प्रत्येकी एक खाते तीन पक्षांकडे असेल, असे ठरले असताना नगरविकास आणि गृह शिवसेनेकडे कसे आले?- नागपूर अधिवेशनापुरती ही केलेली व्यवस्था आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खाते वाटपात पुन्हा काही बदल होतील. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. आमच्यात कोणताही वाद नाही. खातेवाटपाबद्दल आमची चर्चा पूर्ण झाली आहे.

प्रश्न : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकही महत्त्वाचे खाते स्वत:कडे का ठेवले नाही?- मुख्यमंत्री म्हणून सर्व खात्यांची अंतिम जबाबदारी शेवटी त्यांच्याकडेच असते. सत्तेचे विक्रेंद्रीकरण करावेच लागते तरच राज्याचा कारभार चांगला चालतो. मी करेन ती पूर्वदिशा असे कधीच होत नसते.मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर अनेक खात्याची ओझी घेऊन फिरु लागले तर ते राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. आमच्याकडे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे असे सगळे अनुभवी नेते आहेत.

आमचा शोले पूर्ण पाच वर्षे चालेल..!महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात होते. मी रोज सकाळी भूमिका मांडत होतो. त्यावर सगळे पुढे जात होते. हे ठरवून केले. मी त्या काळात रंगभूमीवरचा एक साधा कलावंत होतो. मला त्या काळात उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका दिली ती मी नीट वठविण्याचा प्रयत्न केला. त्यातून आमचा शो हाऊसफुल झाला आणि पुढे हा शो पाच वर्षे हाऊसफुल चालेल. आम्ही ‘शोले’ चा देखील विक्रम मोडित काढू!

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस