शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

दुष्काळी परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, शरद पवार यांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:51 IST

राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे.

मुंबई  - राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. पण दुष्काळाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा पक्षाने घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. दुष्काळी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडले. दुष्काळाबाबत दौरे करण्यास व निर्णय घेण्यास सरकारला उशीर झाला आहे. सरकारने फळबागा वाचविण्यासाठी अतिरिक्त मदत द्यावी. पशुधन वाचविण्यासाठी निधी वाढवावा. शेतकऱ्यांकडून होत असलेली सर्व प्रकारची वसुली त्वरित थांबवावी. कर्जमाफी व कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुष्काळ निवारणाचे काम करताना निवडणूक आयोगाचा अडथळा होत नाही, असा आपला अनुभव असल्याचे पवार म्हणाले.मुख्यमंत्र्यांची घेतली भेटराज्यातील भीषण दुष्काळाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या शिष्टमंडळात होते.राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाहीराज ठाकरे यांची पाठराखण करताना पवार म्हणाले की, राज यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्याकडून सभांचा खर्च मागणे चुकीचे आहे. या काळात आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, तो लोकशाहीने दिलेला आहे. १९७७ मध्ये आणीबाणीविरोधात पु. ल. देशपांडे व इतरांनी प्रचार केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणीही प्रचाराचा खर्च मागितला नव्हता, याचे स्मरण पवारांनी आयोगाला करून दिले.मोदी काहीही बोलतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज आहे. निकालानंतर देशात नवीन सरकार अस्तित्वात येईल. राष्ट्रपतींनी संधी दिल्यावर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हानात्मक काम केवळ आम्हीच करू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षणमंत्री म्हणून मी काम केले आहे. आम्ही संरक्षण खात्याच्या कामगिरीचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही. दलाच्या कामगिरीचा गैरवापर निवडणुकीसाठी केला जाणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती असा गैरवापर करत आहे, हे अधिक दुर्दैवी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कान टोचले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार