शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मंत्रालयात जाळी बसवून सरकारने केली शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा - रघुनाथदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:43 IST

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मंत्रालयाला जाळी बसवून मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले. ही शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा आहे, अशी टीका...

 सांगली  - शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मंत्रालयाला जाळी बसवून मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले. ही शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी आंदोलनापुढे मुख्यमंत्र्यांना झुकावे लागले. त्यांनी आंदोलनाची दखल घेऊन बरीच आश्वासने दिली, मात्र त्यातील एकाचेही पालन त्यांनी केले नाही. परिणामी वर्षभर शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच राहिले. धर्मा पाटील यांना मंत्रालयासमोर आत्महत्या करावी लागली. अशावेळी संबंधित शेतकºयांच्या प्रश्नावर उपाय शोधण्याऐवजी मंत्रालयासमोर कुणी आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा उपाय शोधला. इतका वेडेपणा दर्शविणारा मुख्यमंत्री आम्ही आजवर पाहिला नाही. शेतकºयांच्या आत्महत्येची ही कुचेष्टा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव कर्पे-पाटील ते धर्मा पाटील आदींसह विविध आंदोलनांमध्ये हौतात्म्य आलेल्या शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी सुकाणू समितीसह शेतकºयांकडून १९ मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्नादात्यांच्या हक्कासाठी एक दिवस अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्मे, हैदराबाद-गोवामुक्ती संग्रामातील हुतात्मे, शेतकरी आंदोलनामधील हुतात्मे, पवना धरणग्रस्त हुतात्मे आदींना अभिवादन करण्यात येणार आहे. वर्षभर शांतता बाळगल्यानंतर आता पुन्हा सुकाणू समितीमार्फत शेतकºयांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. आता मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आम्हाला नको, निर्णयांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित शिंदे म्हणाले की, जिल्हा सुधार समितीसुद्धा शेतकरी संघटनांच्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहे. सांगलीत १६ रोजी बैठकसांगलीत येत्या १६ फेब्रुवारीस मार्केट यार्डातील वसंतदादा शेतकरी भवनात सुकाणू समितीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शेतकºयांच्या विविध प्रश्नावर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसाठी शेरमुख्यमंत्र्यांना उद्देशून रघुनाथदादांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत एक शेर सादर केला. मुहाओजोंसे नही रुकती मौत, वो दरवाजे बंद कर दो, जहॉँ से आती है मौत! सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी या शेरचा विचार धोरण ठरविताना करावा, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार