शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, आणखी 250 मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:46 IST

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई - राज्यातील आणखी 250 मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी, कालच सरकारने 151 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी 250 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ट्रीगर वन, ट्रीगर टू आणि ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे जे तालुके दुष्काळ यादीत बसले त्या 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळामध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तसेच 700 मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा 250 मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तसेच एक समिती गठीत करण्यात आली असून दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाजू असतील, याबाबत आलेली निवेदने असतील, याची तपासणी करून त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळRainपाऊसministerमंत्री