शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, आणखी 250 मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:46 IST

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई - राज्यातील आणखी 250 मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी, कालच सरकारने 151 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी 250 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ट्रीगर वन, ट्रीगर टू आणि ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे जे तालुके दुष्काळ यादीत बसले त्या 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळामध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तसेच 700 मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा 250 मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तसेच एक समिती गठीत करण्यात आली असून दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाजू असतील, याबाबत आलेली निवेदने असतील, याची तपासणी करून त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळRainपाऊसministerमंत्री