शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

लालबागमध्ये सामाजिक बांधिलकीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

By admin | Updated: August 24, 2016 01:46 IST

लालबागमधील सुप्रसिद्ध असलेले तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

मुंबई : लालबागमधील सुप्रसिद्ध असलेले तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १९६७ साली स्थापन झालेले हे मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक जाणिवेतून सांस्कृतिक वारसा जपत आहे. या मंडळाचा बाप्पा दरवर्षी वेगवेगळ्या रूपात विराजमान होतो. १९७२-७३ साली मूर्तिकार विठ्ठल झाड हे या बाप्पाची मूर्ती साकारत होते. त्यानंतर मूर्ती घडविण्याची जबाबदारी गेली अनेक वर्षे त्यांचे पुत्र मूर्तिकार राजन झाड यांनी स्वीकारली आहे. बुद्धीची देवता असलेली नयनरम्य व सुबक मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त दूरवरून येत असतात. ‘संकल्पपूर्ती राजा तेजुकायाचा’असे या मंडळाचे ब्रीदवाक्य आहे. यंदा पूजेसाठी लहान मूर्तीची प्रतिष्ठाना करण्यात येणार असून, मूर्तिकार मनोहर बागवे यांनी ती साकारली आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात २८ आॅगस्ट रोजी या बाप्पाचा आगमन सोहळा रंगणार आहे. (प्रतिनिधी)।यंदा बळीराजाच्या संकल्पनेवर आधारित देखावाबळीराजा सततच्या दुष्काळामुळे व भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे त्रासलेला आहे. शेतीमधील मालाला कमी भाव, कमाल जमीन धारणा कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, सावकाराचे कर्जाचे पाश, शेतीसाठी लागणारे बी-बियाणांचे वाढलेले दर, वेळी-अवेळी पडणाऱ्या पावसामुळे होणारे मालाचे नुकसान, यामुळे त्रस्त होऊन आपला बळीराजा आत्महत्या करतो आहे. अशा वेळी गणपती बाप्पा आपल्या अन्नदात्या बळीराजाच्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी व त्याला सुखी, समाधानी आणि सधन करण्याकरिता भव्य रथामधून भ्रष्टाचाराला पायदळी तुडवत भक्तांच्या दर्शनासाठी येणार आहे.>विशेष सामाजिक उपक्रमसुवर्ण महोत्सवी वर्षात जमा होणाऱ्या निधीतून समाजाचे उत्तरदायित्व म्हणून नियोजित सामाजिक उपक्रम ट्रस्टने हाती घेतलेले आहेत. त्यात दुष्काळग्रस्त गावात नागरिकांना व विद्यार्थ्यांना वस्तंूचे वाटप, अष्टविनायक यात्रा, के.ई.एम. रुग्णालय, टाटा रुग्णालयातील नातेवाइकांना अन्नदान, डायलिसीसच्या रुग्णांना आर्थिक मदत आणि महापालिका रुग्णालयात व्हीलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे.>समाजऋण जपण्यासाठी गेली अनेक वर्षे मंडळाच्या वतीने समाजातील प्रत्येक घटकासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला जातो. उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपात स्पर्धा न करता साधेपणा जपत उत्सव साजरा करण्यावर मंडळाचा अधिक भर असतो.- विजय देशमुख, सल्लागार, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट